Mumbai: शूटिंगला जात असलेल्या टीव्ही अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू

Share

मुंबई: टीव्ही मालिका ‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अभिनेता अमन जायसवालचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा अभिनेता बाईकवरून शूटिंगसाठी जात होता. यावेळी मुंबईच्या जोगेश्वरी हायवेवर ट्रकने त्याच्या बाईकला टक्कर दिली. यात तो हायवेवर पडला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

अमन जायसवाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील बलिया येथील होता. तो अभिनेता बनण्याच्या स्वप्नाने मुंबईत आला होता. आपल्या मेहनतीने त्याने आपले स्वप्न पूर्ण केले होते. दरम्यान, या रस्ते अपघातामुळे या अभिनेत्याला कमी वयातच आपले प्राण गमवावे लागले. अमनचे वय केवळ २३ वर्षे इतके होते. २०२३मध्ये नजारा टीव्ही चॅनेलवर धरतीपुत्र नंदिनी ही मालिका सुरू झाली होती. या मध्ये तो पहिल्यांदा मुख्य भूमिकेत होता. याआधी तो उडारिया आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईक या टीव्हीशोजमध्ये छोट्या मोठ्या भूमिकेत दिसला होता. तो ऑडिशनसाठी होणाऱ्या स्क्रीन टेस्टसाठी शूटिंग करण्यासाठी जात होता.

अमनला सुरूवातीपासूनच अभिनेता बनायचे होते. दरम्यान, त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने आयएएस अधिकारी, इंजीनियर अथवा डॉक्टर व्हावे. अमनला त्याच्या आईने साथ दिली होती तसेच वडिलांनाही समजावले होते. अमन अनेकदा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला देत असे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

45 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago