मुंबई: टीव्ही मालिका ‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अभिनेता अमन जायसवालचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा अभिनेता बाईकवरून शूटिंगसाठी जात होता. यावेळी मुंबईच्या जोगेश्वरी हायवेवर ट्रकने त्याच्या बाईकला टक्कर दिली. यात तो हायवेवर पडला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.
अमन जायसवाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील बलिया येथील होता. तो अभिनेता बनण्याच्या स्वप्नाने मुंबईत आला होता. आपल्या मेहनतीने त्याने आपले स्वप्न पूर्ण केले होते. दरम्यान, या रस्ते अपघातामुळे या अभिनेत्याला कमी वयातच आपले प्राण गमवावे लागले. अमनचे वय केवळ २३ वर्षे इतके होते. २०२३मध्ये नजारा टीव्ही चॅनेलवर धरतीपुत्र नंदिनी ही मालिका सुरू झाली होती. या मध्ये तो पहिल्यांदा मुख्य भूमिकेत होता. याआधी तो उडारिया आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईक या टीव्हीशोजमध्ये छोट्या मोठ्या भूमिकेत दिसला होता. तो ऑडिशनसाठी होणाऱ्या स्क्रीन टेस्टसाठी शूटिंग करण्यासाठी जात होता.
अमनला सुरूवातीपासूनच अभिनेता बनायचे होते. दरम्यान, त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने आयएएस अधिकारी, इंजीनियर अथवा डॉक्टर व्हावे. अमनला त्याच्या आईने साथ दिली होती तसेच वडिलांनाही समजावले होते. अमन अनेकदा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला देत असे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…