Mumbai: शूटिंगला जात असलेल्या टीव्ही अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू

  83

मुंबई: टीव्ही मालिका 'धरतीपुत्र नंदिनी' फेम अभिनेता अमन जायसवालचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा अभिनेता बाईकवरून शूटिंगसाठी जात होता. यावेळी मुंबईच्या जोगेश्वरी हायवेवर ट्रकने त्याच्या बाईकला टक्कर दिली. यात तो हायवेवर पडला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.


अमन जायसवाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील बलिया येथील होता. तो अभिनेता बनण्याच्या स्वप्नाने मुंबईत आला होता. आपल्या मेहनतीने त्याने आपले स्वप्न पूर्ण केले होते. दरम्यान, या रस्ते अपघातामुळे या अभिनेत्याला कमी वयातच आपले प्राण गमवावे लागले. अमनचे वय केवळ २३ वर्षे इतके होते. २०२३मध्ये नजारा टीव्ही चॅनेलवर धरतीपुत्र नंदिनी ही मालिका सुरू झाली होती. या मध्ये तो पहिल्यांदा मुख्य भूमिकेत होता. याआधी तो उडारिया आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईक या टीव्हीशोजमध्ये छोट्या मोठ्या भूमिकेत दिसला होता. तो ऑडिशनसाठी होणाऱ्या स्क्रीन टेस्टसाठी शूटिंग करण्यासाठी जात होता.


अमनला सुरूवातीपासूनच अभिनेता बनायचे होते. दरम्यान, त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने आयएएस अधिकारी, इंजीनियर अथवा डॉक्टर व्हावे. अमनला त्याच्या आईने साथ दिली होती तसेच वडिलांनाही समजावले होते. अमन अनेकदा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला देत असे.

Comments
Add Comment

Parag Tyagi trolled: शेफालीच्या मृत्युला २४ तास उलटत नाही, तोच पती पराग... युजर्सने केले ट्रोल

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर लगेचच पराग त्यागी कुत्र्यासोबत फिरताना दिसला Parag Tyagi Was Seen Walking With Dog: शेफाली जरीवालाचा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

बिग बॉसचं शापित घर... शेफालीच्या आधी सुद्धा झालं होत सहा स्पर्धकांचा अकस्मात निधन...

अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीस पावली होती.सलमान

पराजूचा दगडू घेऊन येत आहे एक नवी कोरी प्रेमकहाणी...

प्रथमेश परबचा नवा सिनेमा... मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जात. लोकलच्या प्रवासात