Kirit Somaiya : ‘पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी’- किरीट सोमय्या

  61

पुणे शहरातून बोगस दाखले नसल्याचेही स्पष्टीकरण


पुणे : बांगलादेशी घुसखोरांवरून देशभरात वातावरण तापू लागले आहे. ठिकठिकाणी बांगलादेशी घुसखोर सापडू लागले आहेत. परंतु, प्रशासनाने या घुसखोरांना सर्व प्रकारची प्रमाणपत्रे पुरविल्याने आजही अनेक बांगलादेशी नागरिक बिनदिक्कत राहत आहेत. २०२४ मध्ये किती बांगलादेशींना जन्माचे दाखले देण्यात आले याची आकडेवारी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मांडली आहे. पुणे शहरात कोणालाही बोगस दाखले देण्यात आलेले नाहीत. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी असल्याचा दावाही त्यांनी केला.


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बांगलादेशी अवैध घुसखोरीसंदर्भात निवेदन दिले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सोमय्या म्हणाले, राज्यात २०२४ मध्ये ६० हजार बांगलादेशींना जन्माचे बोगस दाखले देण्यात आले आहेत. मालेगाव ४५००, अमरावतीत १४५०० एवढे प्रचंड संख्येने दाखले देण्यात आले आहेत. मुंबईत ५८ दाखले देण्यात आले असून पुणे शहरात कोणालाही बोगस दाखले देण्यात आलेले नाहीत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.



२०२३ नोव्हेंबरमध्ये जन्म मृत्यूच्या दाखल्यांचा अधिकार तहसीलदारांना देण्यात आला म्हणून हा गोंधळ झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहेत. त्याची माहिती मी मागविली आहे. ही माहिती मिळताच मी लगेचच एटीएसला ती देणार आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले म्हणून हे बाहेर आले, असे सोमय्या यांनी नमूद केले.


वाल्मीक कराड विषय वेगळा आहे. यात कोणालाही सोडले जाणार नाही. कालपर्यंत सुळे आणि ते सोबत होते. वाल्मीक कराडला नोटीस आली, तेव्हा सरकार त्यांचेच होते. मी कोणाविषयी तक्रार मागे घेतली नाही, असेही कराड यांच्यावरील ईडी नोटीस कारवाईवर सोमय्या यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या