Coldplay Concert : कोल्डप्लेला जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! मुंबईहून अहमदाबादसाठी सुटणार विशेष रेल्वे

मुंबई : गुजरातमध्ये होणाऱ्या कोल्डप्लेची (Coldplay Concert) घोषणा होताच देशभरातील अनेक संगीतप्रेमींचा उत्साह गगनाला भिडत चालला होता. अशातच गुजरात कोल्डप्ले कॉन्सरच्ला जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहता पश्चिम रेल्वेने (Western Railway) आनंदाची बातमी दिली आहे. पश्चिम रेल्वे गुजरात कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी मुंबईहून अहमदाबादसाठी विशेष ट्रेन (Special Train) सोडणार आहे. त्यामुळे गुजरात येथील कोल्डप्ले कॉन्सर्टला जाणाऱ्यांसाठी याचा चांगलाच फायदा होणार आहे.



कसे असेल वेळापत्रक?



  • मुंबई ते अहमदाबाद विशेष रेल्वे गाड्या २५ आणि २६ जानेवारी रोजी चालवण्यात येणार आहेत. पहिली ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून दुपारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अहमदाबाद येथे पोहचेल. तर परतीची ट्रेन रेल्वे मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.

  • तर दुसरी ट्रेन २७ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून ५० मिनिटांनी अहमदाबाद येथून सुटणार आहे आणि सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल. या ट्रेन बोरीवली, वापी, उधना, सूरत, भरूच, वडोदरा आणि गरतापुर या स्थानकांवर थांबेल.


दरम्यान, कोल्डप्ले कॉन्सर्टवेळी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने विशेष लोकल सोडण्याचे नियजन केले आहे. या दोन्ही विशेष रेल्वेची तिकिटे बुक माय शो द्वारे बुक करता येणार आहे.



नवी मुंबईतील कोल्डप्लेसाठी विशेष रेल्वे


रेल्वे प्रशासनाने नवी मुंबईतील डी. व्हाय. पाटील स्टेडियम येथे होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी देखील विशेष रेल्वेचे आयोजन केले आहे. नवी मुंबईत १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी होणारे या कॉन्सर्टसाठी गोरेगाव ते नेरुळ स्थानकादरम्यान धावणार आहेत. या लोकल फक्त कोल्डप्ले सभासदांसाठीच असणार आहेत.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार