मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जमीन ३१ जानेवारीपर्यंत सुपूर्द करणार

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारत संकुलाच्या बांधकामासाठी ३१ जानेवारीपर्यंत ५.२५ एकर जमिनीचा भाग सुपूर्द करणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.


राज्य सरकारने न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, पहिल्या टप्प्यात ४.३९ एकर जमीन ऑक्टोबर २०२४ मध्ये उच्च न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यातील ५.२५ एकर जमिनीचा ताबा डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत देण्यात येणार होती. मात्र काही अडचणींमुळे जमीन हस्तांतरण झाले नाही.



महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितले की, ५.२५ एकर जमीन ताब्यात देण्यासाठी पावले उचलण्यात आली असून अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. आम्ही ३१ जानेवारीपर्यंत वेळ मागत आहोत, या मुदतीत जमीन हस्तांतरित केली जाईल, असे सराफ यांनी खंडपीठाला सांगितले.


महाधिवक्ता म्हणाले की, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी देखील पावले उचलली गेली आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, ते उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या संकुलाच्या बांधकामासाठी डिसेंबरपर्यंत जमिनीचा पुढील भाग सुपूर्द करतील. राज्य सरकारने ३०.१६ एकर जमिनीचा ताबा टप्प्याटप्प्याने उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला जाईल, असे सांगितले होते.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.