छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये १२ नक्षलवादी ठार

बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. चकमक अद्याप सुरू आहे. यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा राखीव रक्षक (District Reserve Guard), केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा पथकाची पाचवी बटालियन (Commando Battalion for Resolute Action) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची २२९ वी बटालियन (Central Reserve Police Force) यांनी संयुक्त कारवाई केली.



सुरक्षा पथकांच्या मोहिमेत जानेवारी महिन्यात आतापर्यंत २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. याआधी १२ जानेवारी रोजी बीजापूर जिल्ह्यातील मद्देड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक चकमक झाली होती. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांसह एकूण पाच नक्षलवादी ठार झाले होते. मागच्या एका वर्षात छत्तीसगडमध्ये २१९ नक्षलवादी ठार झाले होते. सुरक्षा पथकांना मिळू लागलेल्या यशामुळे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत.
Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.