Tadoba : उपासमारीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मृत्यूशी झुंज देतायत

  124

चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात १५ दिवसांत सहा वाघांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पण चंद्रपूरमध्येच उपासमारीमुळे वाघांचे मृत्यू होऊ लागले आहेत. ताजी घटना पेंच येथील आहे. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वन विभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. या बछड्याला पुरेसं अन्न न मिळाल्याने त्याची उपासमार होऊन मृत्यू झाला.



उपासमारीमुळे वाघांचे मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. विकास कामांकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. जंगलतोड करुन शहरीकरण करण्याचे काम झपाट्याने सुरू आहे. यामुळे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिकार करण्यासाठी वन्यजीव उपलब्ध होत नसल्यामुळे वाघ जंगलातून बाहेर पडत आहेत. जंगलाबाहेरच्या वातावरणात टिकाव धरणे कठीण झाल्यामुळे पेंचमध्ये वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू झाला. ताज्या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमी यांनी दुःख व्यक्त केले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी तातडीने आवश्यक ते उपाय करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


वाघांचे मृत्यू होण्याची कारणे पुढीलप्रमाणे :


१. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये आपसात झालेल्या झुंजीत दोन वाघ जखमी झाले आहेत.


२. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा उपासमार होऊन मृत्यू झाला.


३. भंडारा जिल्ह्यात एका वाघाची अत्यंत निर्घृणपणे शिकार करण्यात आली.


४. एक वाघ वाहनाच्या धडकेत ठार झाला


५. चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाला.


६. गोंदिया जिल्ह्यात एका पट्टेदार वाघाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला.

Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना