Tadoba : उपासमारीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मृत्यूशी झुंज देतायत

चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात १५ दिवसांत सहा वाघांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पण चंद्रपूरमध्येच उपासमारीमुळे वाघांचे मृत्यू होऊ लागले आहेत. ताजी घटना पेंच येथील आहे. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वन विभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. या बछड्याला पुरेसं अन्न न मिळाल्याने त्याची उपासमार होऊन मृत्यू झाला.



उपासमारीमुळे वाघांचे मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. विकास कामांकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. जंगलतोड करुन शहरीकरण करण्याचे काम झपाट्याने सुरू आहे. यामुळे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिकार करण्यासाठी वन्यजीव उपलब्ध होत नसल्यामुळे वाघ जंगलातून बाहेर पडत आहेत. जंगलाबाहेरच्या वातावरणात टिकाव धरणे कठीण झाल्यामुळे पेंचमध्ये वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू झाला. ताज्या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमी यांनी दुःख व्यक्त केले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी तातडीने आवश्यक ते उपाय करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


वाघांचे मृत्यू होण्याची कारणे पुढीलप्रमाणे :


१. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये आपसात झालेल्या झुंजीत दोन वाघ जखमी झाले आहेत.


२. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा उपासमार होऊन मृत्यू झाला.


३. भंडारा जिल्ह्यात एका वाघाची अत्यंत निर्घृणपणे शिकार करण्यात आली.


४. एक वाघ वाहनाच्या धडकेत ठार झाला


५. चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाला.


६. गोंदिया जिल्ह्यात एका पट्टेदार वाघाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला.

Comments
Add Comment

Crop registration : आता प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

डिजिटल क्रॉप सर्वेक्षण होणार; तलाठी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या जबाबदाऱ्या

'Operation Tiger' : खासदार फुटी’च्या अफवांचे सूत्रधार उबाठाचेच नेते!

अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’चे थोतांड; खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका मुंबई :

Pune FDA Action : पुण्यात एफडीएची कारवाई; मावळमध्ये भेसळयुक्त आंबा पल्प जप्त

पुणे : उन्हाळ्यात नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत

Nanded Railway : महाराष्ट्रातून उत्तर भारतीयांसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध, पण नांदेड एक्स्प्रेसचा मुहूर्त कधी लागणार ?

मुंबई : मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवनवीन गाड्या उपलब्ध होत आहेत. मात्र,

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार; कामशेतमध्ये दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये.....

पुणे : पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात दुकानांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या