Tadoba : उपासमारीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मृत्यूशी झुंज देतायत

  97

चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात १५ दिवसांत सहा वाघांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पण चंद्रपूरमध्येच उपासमारीमुळे वाघांचे मृत्यू होऊ लागले आहेत. ताजी घटना पेंच येथील आहे. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वन विभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. या बछड्याला पुरेसं अन्न न मिळाल्याने त्याची उपासमार होऊन मृत्यू झाला.



उपासमारीमुळे वाघांचे मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. विकास कामांकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. जंगलतोड करुन शहरीकरण करण्याचे काम झपाट्याने सुरू आहे. यामुळे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिकार करण्यासाठी वन्यजीव उपलब्ध होत नसल्यामुळे वाघ जंगलातून बाहेर पडत आहेत. जंगलाबाहेरच्या वातावरणात टिकाव धरणे कठीण झाल्यामुळे पेंचमध्ये वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू झाला. ताज्या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमी यांनी दुःख व्यक्त केले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी तातडीने आवश्यक ते उपाय करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


वाघांचे मृत्यू होण्याची कारणे पुढीलप्रमाणे :


१. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये आपसात झालेल्या झुंजीत दोन वाघ जखमी झाले आहेत.


२. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा उपासमार होऊन मृत्यू झाला.


३. भंडारा जिल्ह्यात एका वाघाची अत्यंत निर्घृणपणे शिकार करण्यात आली.


४. एक वाघ वाहनाच्या धडकेत ठार झाला


५. चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाला.


६. गोंदिया जिल्ह्यात एका पट्टेदार वाघाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत