बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडला बुधवारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. असे असले तरी दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतंय. मंगळवारी कराडच्या समर्थकांसह त्याच्या मातोश्रींनीही आंदोलन केले. कराडवर राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी कराड समर्थकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. बुधवारी परळीमध्ये कराड समर्थकांची बैठक होणार असून या बैठकीत आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवर राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे असे कराडच्या कुटुंबियांचे व समर्थकांचे म्हणणे आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी मंगळवारी कराडच्या समर्थकांनी शासकीय इमारतीवर चढून आंदोलन केले. तसेच कराडच्या मातोश्रींनीही परळीच्या पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी झालेल्या आंदोलनात समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काही समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला होता. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना परळीत आंदोलन होण्याची शक्यता असल्यामुळे शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. एकीकडे बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले असताना परळीमध्ये आंदोलन होत आहे.
मंगळवारी रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आता बुधवारी कराड समर्थकांची बैठक होणार आहे. या बैठकीतून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. आंदोलनादरम्यान परळी शहर बंद ठेवण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आता न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…