Walmik karad : कराड समर्थकांनी पुन्हा दिली परळी बंदची हाक

  95

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडला बुधवारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. असे असले तरी दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतंय. मंगळवारी कराडच्या समर्थकांसह त्याच्या मातोश्रींनीही आंदोलन केले. कराडवर राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी कराड समर्थकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. बुधवारी परळीमध्ये कराड समर्थकांची बैठक होणार असून या बैठकीत आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवर राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे असे कराडच्या कुटुंबियांचे व समर्थकांचे म्हणणे आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी मंगळवारी कराडच्या समर्थकांनी शासकीय इमारतीवर चढून आंदोलन केले. तसेच कराडच्या मातोश्रींनीही परळीच्या पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी झालेल्या आंदोलनात समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काही समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला होता. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना परळीत आंदोलन होण्याची शक्यता असल्यामुळे शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. एकीकडे बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले असताना परळीमध्ये आंदोलन होत आहे.



मंगळवारी रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आता बुधवारी कराड समर्थकांची बैठक होणार आहे. या बैठकीतून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. आंदोलनादरम्यान परळी शहर बंद ठेवण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आता न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक