ऑस्ट्रेलिया पराभवानंतर बीसीसीआयचे कठोर धोरण, परदेशी दौऱ्याबाबत केला हा नियम

मुंबई: भारताला ऑस्ट्रेलियाकडून नुकताच पराभवाचा सामना करावा लागला.यामुळे कर्णधार, खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यावर केवळ टीकाच झाली नाही, तर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रडारवरही आले आहेत. यांनतर, आता बीसीसीआय कठोर पावले उचलणार आहे. यानुसार, खेळाडूंच्या पत्नी संपूर्ण दौऱ्यावर त्यांच्यासोबत जाऊ शकणार नाहीत. त्यांना आपल्या पतीसोबत राहण्यासाठी केवळ काही दिवसच मिळतील, अशी महिती आता समोर आली आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर बीसीसीआयने मुंबईत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर, बोर्ड आता खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे. ज्यामध्ये क्रिकेटर्सच्या पत्नी संपूर्ण ४५ दिवसांच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत राहू शकणार नाही. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त दोन आठवडे राहण्याची परवानगी असेल. संपूर्ण परदेश दौऱ्यांदरम्यान खेळाडूंचे कुटुंब सोबत असल्याने, खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो, यासंदर्भात विचार करण्यात आला. यामुळे, खेळाडूंच्या कुटुंबियांना परदेश दौऱ्यादरम्यान केवळ १४ दिवसांसाठी त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी असेल. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ पूर्वी असलेले नियम लागू होणार आहेत.


नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ४५ किंवा त्याहून अधिक दिवस चालणाऱ्या स्पर्धेत पत्नी किंवा कुटुंब केवळ १४ दिवस खेळाडूसोबत राहू शकतील. जर दौरा लहान असेल तर हा कालावधी सात दिवसांचा असेल. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील १-३ पराभवाच्या वेळी अनेक क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि कुटुंबीय संपूर्ण वेळ ऑस्ट्रेलियात होते. गेल्या काही वर्षांत काही खेळाडू संघाच्या बसने सोबत न जाता वेगळे प्रवास करत असल्याचे दिसून आले. आता याबाबतही कडक कारवाई करण्यात येणार आहे. सांघिक एकतेच्या दृष्टीने आता सर्व खेळाडू टीम बसनेच प्रवास करतील. तो कितीही मोठा खेळाडू असला तरी त्याला वेगळे जाऊ दिले जाणार नाही.

Comments
Add Comment

Indian Team Schedule : जुलै महिन्यात भारतीय संघ किती सामने खेळणार ? जाणून घ्या संपू्र्ण वेळपत्रक; इंग्लंडमध्ये किती सामने होणार ?

मुंबई : भारतीय संघ पुढच्या महिन्यात (जुलै) इंग्लंच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन दिग्गज पुनरागमन करणार

Vaibhav Sooryvanshi : आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास ! रोहित- हार्दिकचा विक्रम मोडणार ?

Mumbai: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज (२६ जून) पासून दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा

FIFA WORLDCUP 2026 : ऑस्ट्रेलियाची बाद फेरीत धडक; पॅराग्वेच्याही आगेकूचची शक्यता

सँटा क्लारा, कॅलिफोर्निया : ऑस्ट्रेलिया आणि पॅराग्वे यांच्यातील सामना गोलशून्य (०-०) बरोबरीत सुटल्यामुळे 'सॉकरूस'

FIFA WORLDCUP 2026 : जपान आणि स्वीडनची बाद फेरीत धडक; सामना १-१ ने अनिर्णित

अर्लिंग्टन, टेक्सास : जपान आणि स्वीडन यांच्यातील अटीतटीचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला असला तरी, या निकालासह

FIFA WORLDCUP 2026 : डच संघाचा दणदणीत विजय; ट्युनिशियाला नमवून विश्वचषकाच्या बाद फेरीत अव्वल स्थान

कॅन्सस सिटी, मिसूरी: पावसाळी हवामान आणि विजांच्या कडकडाटाच्या व्यत्ययानंतरही नेदरलँड्सने ट्युनिशियावर ३-१ असा

FIFA WORLDCUP 2026 : इक्वेडोरची ऐतिहासिक कामगिरी; जर्मनीवर मात करत विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक

ईस्ट रदरफोर्ड, एनजे : गोंझालो प्लाटाच्या निर्णायक गोलच्या जोरावर इक्वेडोरने बलाढ्य जर्मनीवर २-१ ने विजय मिळवत