ऑस्ट्रेलिया पराभवानंतर बीसीसीआयचे कठोर धोरण, परदेशी दौऱ्याबाबत केला हा नियम

Share

मुंबई: भारताला ऑस्ट्रेलियाकडून नुकताच पराभवाचा सामना करावा लागला.यामुळे कर्णधार, खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यावर केवळ टीकाच झाली नाही, तर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रडारवरही आले आहेत. यांनतर, आता बीसीसीआय कठोर पावले उचलणार आहे. यानुसार, खेळाडूंच्या पत्नी संपूर्ण दौऱ्यावर त्यांच्यासोबत जाऊ शकणार नाहीत. त्यांना आपल्या पतीसोबत राहण्यासाठी केवळ काही दिवसच मिळतील, अशी महिती आता समोर आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर बीसीसीआयने मुंबईत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर, बोर्ड आता खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे. ज्यामध्ये क्रिकेटर्सच्या पत्नी संपूर्ण ४५ दिवसांच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत राहू शकणार नाही. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त दोन आठवडे राहण्याची परवानगी असेल. संपूर्ण परदेश दौऱ्यांदरम्यान खेळाडूंचे कुटुंब सोबत असल्याने, खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो, यासंदर्भात विचार करण्यात आला. यामुळे, खेळाडूंच्या कुटुंबियांना परदेश दौऱ्यादरम्यान केवळ १४ दिवसांसाठी त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी असेल. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ पूर्वी असलेले नियम लागू होणार आहेत.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ४५ किंवा त्याहून अधिक दिवस चालणाऱ्या स्पर्धेत पत्नी किंवा कुटुंब केवळ १४ दिवस खेळाडूसोबत राहू शकतील. जर दौरा लहान असेल तर हा कालावधी सात दिवसांचा असेल. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील १-३ पराभवाच्या वेळी अनेक क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि कुटुंबीय संपूर्ण वेळ ऑस्ट्रेलियात होते. गेल्या काही वर्षांत काही खेळाडू संघाच्या बसने सोबत न जाता वेगळे प्रवास करत असल्याचे दिसून आले. आता याबाबतही कडक कारवाई करण्यात येणार आहे. सांघिक एकतेच्या दृष्टीने आता सर्व खेळाडू टीम बसनेच प्रवास करतील. तो कितीही मोठा खेळाडू असला तरी त्याला वेगळे जाऊ दिले जाणार नाही.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

13 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

41 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago