पंतप्रधान मोदींच्या हस्ते झेड-मोर बोगद्याचे लोकार्पण; श्रीनगर ते कारगिल-लेह मार्ग आता वर्षभर राहणार खुला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन केले. या बोगद्याच्या बांधकामानंतर लडाखला जाणे आणि तेथून प्रवास करणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. श्रीनगर ते कारगिल-लेह हा मार्गही आता वर्षभर खुला राहील. हा बोगदा भारतीय सैन्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे हा महामार्ग बंद राहणार नाही. त्यामुळे सैन्य वर्षभर या बोगद्याचा वापर करून सीमावर्ती भागात पोहोचू शकते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुप्रतिक्षित सोनमर्ग बोगद्याचे सोमवारी उद्घाटन केले. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि डॉ. जितेंद्र सिंह, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि इतर अधिकारी होते. कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी यांनी बोगद्याला भेट दिली. श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर सोनमर्ग आणि गगनगीरला जोडणारा हा बोगदा ८,६५० फूट उंचीवर आहे. झेड आकारात बांधलेला हा बोगदा ६.५ किमी लांबीचा आहे. आपत्कालीन परिस्थितीत ७.५ मीटर रुंद समांतर मार्ग आहे. गगनगीर आणि सोनमर्गमधील अंतर सुमारे ६ किमीने कमी झाले आहे. पूर्वी हे अंतर कापण्यासाठी एक तास लागत होता, पण आता ते १५ मिनिटांपर्यंत कमी होईल. हा बोगदा वर्षभर लडाखला रस्त्याने जोडेल आणि देशाच्या संरक्षण गरजा आणि प्रादेशिक विकासातही महत्त्वाची भूमिका बजावेल.


लडाख प्रदेशाला काश्मीर खोऱ्याशी जोडण्यासाठीही हा बोगदा उपयुक्त ठरेल. हा बोगदा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो उन्हाळा आणि हिवाळ्यात या प्रदेशाला जोडण्यासाठी महत्त्वाचा आहे. झेड-मोर बोगद्यामुळे पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना प्रवास सुलभ होईल. लडाख प्रदेशाला काश्मीर खोऱ्याशी जोडण्यास मदत होईल. हा प्रकल्प या प्रदेशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या बोगद्यामुळे परिसरातील पर्यटन आणि व्यवसाय वाढण्यास मदत होईल.


मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावेळी म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रीनगरमधील कार्यक्रमात तुम्ही ३ अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्ही म्हणाला होता की, तुम्ही दिल(मन) आणि दिल्लीतील अंतर कमी करण्याचे काम करत आहात आणि हे तुमच्या कामातून सिद्ध झाले आहे. तुम्ही जम्मू-काश्मीरच्या जनतेला सांगितले होते की, लवकरच निवडणुका होतील आणि लोकांना त्यांच्या मतांद्वारे सरकार निवडण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमचे शब्द खरे ठरवले आणि ४ महिन्यांत निवडणुका झाल्या. नवे सरकार निवडून आले.

Comments
Add Comment

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात