Mumbai Accident : मुंबईत १२ व्या मजल्यावरून खाली कोसळून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

  116

मुंबई : मुंबईच्या अंधेरी परिसरात एक तरुण इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून कोसळल्याची घटना घडली आहे. मेट्रो स्टेशन खाली इमारतीचं बांधकाम सुरू असताना २० वर्षीय तरुण इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून खाली कोसळला असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, शदाप (वय २०) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातील जेबी नगर परिसरात घडली आहे. जे.बी नगर मेट्रो स्टेशन खाली सहार प्लाझाच्या शेजारी नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता तो इमारतीच्या १२ व्या मजल्यावर काम करत होता.अचानक तो इमारतीच्या १२व्या मजल्यावरून खाली कोसळला. या दुर्घटनेत शदापचा जागीच मृत्यू झाला आहे. तो या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक सुपरवायझर म्हणून काम करत होता. इमारतीत काम करणाऱ्या इतर कामगारांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


या घटनेची माहिती मिळतच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी शदाबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही