Mumbai Accident : मुंबईत १२ व्या मजल्यावरून खाली कोसळून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई : मुंबईच्या अंधेरी परिसरात एक तरुण इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून कोसळल्याची घटना घडली आहे. मेट्रो स्टेशन खाली इमारतीचं बांधकाम सुरू असताना २० वर्षीय तरुण इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून खाली कोसळला असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, शदाप (वय २०) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातील जेबी नगर परिसरात घडली आहे. जे.बी नगर मेट्रो स्टेशन खाली सहार प्लाझाच्या शेजारी नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता तो इमारतीच्या १२ व्या मजल्यावर काम करत होता.अचानक तो इमारतीच्या १२व्या मजल्यावरून खाली कोसळला. या दुर्घटनेत शदापचा जागीच मृत्यू झाला आहे. तो या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक सुपरवायझर म्हणून काम करत होता. इमारतीत काम करणाऱ्या इतर कामगारांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


या घटनेची माहिती मिळतच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी शदाबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे