राष्ट्रीय युवा दिन म्हणजे काय ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ?

  151

नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करतात. शिकागोच्या धर्मसभेत स्वामी विवेकानंद यांनी जगाला हिंदू धर्माची सहज, सोप्या, सुंदर शब्दात नव्याने ओळख करुन दिली होती. स्वामी विवेकानंद यांचे कार्य आजही तरुणांना प्रेरणादायी असे आहे. या कार्याची आठवण आणि स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. भारत सरकारने १९८४ मध्ये राष्ट्रीय युवा दिनाची घोषणा केली आणि १२ जानेवारी १९८५ पासून राष्ट्रीय युवा दिन अर्थात राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.



स्वामी विवेकानंद हे तत्वज्ञ, अध्यात्म गुरु, समाजसुधारक आणि धार्मिक शिक्षक होते. त्यांच्या आत्मनिर्भरता, शिस्त, शिक्षण आणि राष्ट्रीय विकासाच्या मूल्यांवरील शिकवणीने तरुणाईला प्रेरणा दिली. कठोर परिश्रम आणि स्वयंशिस्तीने तरुण देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असे विवेकानंद म्हणायचे. स्वामी विवेकानंदांचा हाच विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शैक्षणिक संस्था राष्ट्रीय युवा दिन उत्साहाने साजरा करतात.



भारत हा तरुणांचा देश आहे. सध्या जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत. यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिनाचे विशेष महत्त्व आहे. भारतातील तरुणांच्या क्षमतेचा आणि योगदानाचा गौरव करणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय युवा दिन. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशातील शाळा - महाविद्यालयांमध्ये मिरवणुका, भाषणे, संगीत, युवा संमेलने, परिसंवाद, योगासने, सादरीकरणे, निबंध-लेखन, पठण आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.

 
Comments
Add Comment

CBSE दहावीच्या बोर्ड परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार

नवी दिल्ली : सीबीएसई दहावीच्या बोर्डाची परीक्षा २०२६ पासून आता वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. केंद्रीय

कधी उडणार भारतात उतरलेले इंग्लंडचे F35B विमान ?

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक शक्तिशाली लढाऊ विमानांमध्ये एफ ३५ बी स्टेल्थ लाइटनिंग टू लढाऊ विमानाचा समावेश होतो.

अंतराळात झेपावण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी पत्नीसाठी लिहिला भावनिक संदेश

कोण आहे शुभांशू शुक्ला यांच्या पत्नी?   नवी दिल्ली: लखनऊ येथील भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (Shubhanshu

Shubhanshu Shukla : पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा!

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ प्रवासावर गेले आहेत. त्यांच्या यशस्वी

अ‍ॅक्सिओम-४ मिशनने पृथ्वीची कक्षा ओलांडली

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला, पोलिश अंतराळवीर स्लावोज उझ्नान्स्की, हंगेरियन अंतराळवीर टिबोर

मनात धाकधूक, टाळ्या अन् मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना... प्रक्षेपणाच्या वेळी भावूक झाली शुभांशू शुक्लाची आई

नवी दिल्ली: शुभांशू शुक्ला अ‍ॅक्सिओम मिशन-४ अंतर्गत आज, दि. २५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) रवाना