राष्ट्रीय युवा दिन म्हणजे काय ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ?

नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करतात. शिकागोच्या धर्मसभेत स्वामी विवेकानंद यांनी जगाला हिंदू धर्माची सहज, सोप्या, सुंदर शब्दात नव्याने ओळख करुन दिली होती. स्वामी विवेकानंद यांचे कार्य आजही तरुणांना प्रेरणादायी असे आहे. या कार्याची आठवण आणि स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. भारत सरकारने १९८४ मध्ये राष्ट्रीय युवा दिनाची घोषणा केली आणि १२ जानेवारी १९८५ पासून राष्ट्रीय युवा दिन अर्थात राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.



स्वामी विवेकानंद हे तत्वज्ञ, अध्यात्म गुरु, समाजसुधारक आणि धार्मिक शिक्षक होते. त्यांच्या आत्मनिर्भरता, शिस्त, शिक्षण आणि राष्ट्रीय विकासाच्या मूल्यांवरील शिकवणीने तरुणाईला प्रेरणा दिली. कठोर परिश्रम आणि स्वयंशिस्तीने तरुण देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असे विवेकानंद म्हणायचे. स्वामी विवेकानंदांचा हाच विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शैक्षणिक संस्था राष्ट्रीय युवा दिन उत्साहाने साजरा करतात.



भारत हा तरुणांचा देश आहे. सध्या जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत. यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिनाचे विशेष महत्त्व आहे. भारतातील तरुणांच्या क्षमतेचा आणि योगदानाचा गौरव करणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय युवा दिन. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशातील शाळा - महाविद्यालयांमध्ये मिरवणुका, भाषणे, संगीत, युवा संमेलने, परिसंवाद, योगासने, सादरीकरणे, निबंध-लेखन, पठण आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.

 
Comments
Add Comment

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या