राष्ट्रीय युवा दिन म्हणजे काय ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ?

नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करतात. शिकागोच्या धर्मसभेत स्वामी विवेकानंद यांनी जगाला हिंदू धर्माची सहज, सोप्या, सुंदर शब्दात नव्याने ओळख करुन दिली होती. स्वामी विवेकानंद यांचे कार्य आजही तरुणांना प्रेरणादायी असे आहे. या कार्याची आठवण आणि स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. भारत सरकारने १९८४ मध्ये राष्ट्रीय युवा दिनाची घोषणा केली आणि १२ जानेवारी १९८५ पासून राष्ट्रीय युवा दिन अर्थात राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.



स्वामी विवेकानंद हे तत्वज्ञ, अध्यात्म गुरु, समाजसुधारक आणि धार्मिक शिक्षक होते. त्यांच्या आत्मनिर्भरता, शिस्त, शिक्षण आणि राष्ट्रीय विकासाच्या मूल्यांवरील शिकवणीने तरुणाईला प्रेरणा दिली. कठोर परिश्रम आणि स्वयंशिस्तीने तरुण देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असे विवेकानंद म्हणायचे. स्वामी विवेकानंदांचा हाच विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शैक्षणिक संस्था राष्ट्रीय युवा दिन उत्साहाने साजरा करतात.



भारत हा तरुणांचा देश आहे. सध्या जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत. यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिनाचे विशेष महत्त्व आहे. भारतातील तरुणांच्या क्षमतेचा आणि योगदानाचा गौरव करणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय युवा दिन. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशातील शाळा - महाविद्यालयांमध्ये मिरवणुका, भाषणे, संगीत, युवा संमेलने, परिसंवाद, योगासने, सादरीकरणे, निबंध-लेखन, पठण आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.

 
Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे