राष्ट्रीय युवा दिन म्हणजे काय ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ?

नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करतात. शिकागोच्या धर्मसभेत स्वामी विवेकानंद यांनी जगाला हिंदू धर्माची सहज, सोप्या, सुंदर शब्दात नव्याने ओळख करुन दिली होती. स्वामी विवेकानंद यांचे कार्य आजही तरुणांना प्रेरणादायी असे आहे. या कार्याची आठवण आणि स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. भारत सरकारने १९८४ मध्ये राष्ट्रीय युवा दिनाची घोषणा केली आणि १२ जानेवारी १९८५ पासून राष्ट्रीय युवा दिन अर्थात राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.



स्वामी विवेकानंद हे तत्वज्ञ, अध्यात्म गुरु, समाजसुधारक आणि धार्मिक शिक्षक होते. त्यांच्या आत्मनिर्भरता, शिस्त, शिक्षण आणि राष्ट्रीय विकासाच्या मूल्यांवरील शिकवणीने तरुणाईला प्रेरणा दिली. कठोर परिश्रम आणि स्वयंशिस्तीने तरुण देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असे विवेकानंद म्हणायचे. स्वामी विवेकानंदांचा हाच विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शैक्षणिक संस्था राष्ट्रीय युवा दिन उत्साहाने साजरा करतात.



भारत हा तरुणांचा देश आहे. सध्या जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत. यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिनाचे विशेष महत्त्व आहे. भारतातील तरुणांच्या क्षमतेचा आणि योगदानाचा गौरव करणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय युवा दिन. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशातील शाळा - महाविद्यालयांमध्ये मिरवणुका, भाषणे, संगीत, युवा संमेलने, परिसंवाद, योगासने, सादरीकरणे, निबंध-लेखन, पठण आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.

 
Comments
Add Comment

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)

Telangana Bus Accident : थरकाप उडवणारा अपघात! हायस्पीड लॉरी थेट बसमध्ये घुसली; किंचाळ्या आणि रक्ताचा सडा; २० हून अधिक लोकांचा दुर्दैवी अंत!

तेलंगणा : तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी (Rangareddy) जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल (Chevella Mandal) येथे झालेल्या एका भीषण बस

ICC Women's Cricket World Cup 2025 : जीत लिया जहां... PM मोदींनी केले अभिनंदन, तर 'मास्टर ब्लास्टर' सचिनला आठवली '१९८३' ची गाथा!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) रविवारी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) एक ऐतिहासिक

Jodhpur Accident : धक्कादायक! ट्रेलरला धडकलेल्या बसमध्ये १८ भाविकांचा दुर्दैवी अंत, जोधपूर हादरले!

जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूर (Jodhpur) जिल्ह्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी रस्ता अपघात घडला आहे. हा अपघात फलोदी

केवळ लग्नास नकार देणे भारतीय न्याय संिहतेनुसार अात्महत्येस चिथावणी ठरत नाही: सर्वोच्च न्यायालय

पुरुषाविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा खटला रद्द नवी दिल्ली : "एका तरुणीने आपले जीवन संपवण्याचे टोकाचे