Israel attacks Iran: बॉलिवूडची अभिनेत्री सोनल चौहान अडकली दुबईत; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

मुंबई: अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला असून मोठा युद्धाचा वणवा पेटला आहे. तिन्ही देशांमध्ये घमासान युद्ध सुरु असून हल्ले- प्रतिहल्ल्यांनी जगभरात खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत ८ देशांना या युद्धाची झळ पोहोचली असून आशिया खंडामध्ये युद्धाचे काळे ढग निर्माण झाले आहेत. या युद्धाचा फटका दुबईलाही बसला असून अनेक जण दुबईत अडकले आहेत. अशातच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनल चौहानही दुबईमध्ये अडकली आहे, तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.



बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान अडकली दुबईत



बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहान दुबईमध्ये अडकली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर दुबईला जाणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ज्यामुळे अभिनेत्रीला भारतात परत येणे कठीण झाले आहे. याबाबत तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत देशाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.


अभिनेत्रीने भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींकडून मदतीची विनंती केली आहे. इंस्टाग्रामवर पंतप्रधानांना टॅग करत अभिनेत्रीने लिहिले आहे की, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सध्या सुरू असलेल्या संकटात मी दुबईमध्ये अडकली आहे. विमाने रद्द करण्यात आली आहेत आणि भारतात परतण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नाही. मला सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी मदत करण्यासाठी मी सरकारकडून मार्गदर्शन आणि पाठिंबा मागते. सुरक्षित परतीसाठी सरकारकडून कोणत्याही मदत आणि मार्गदर्शनासाठी मी अत्यंत आभारी राहीन.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१