Israel - Iran War : युद्धाचा हवाई वाहतुकीवर परिणाम; मुंबई विमानतळासह देशभरातील तब्बल ४४४ उड्डाणे रद्द

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी सकाळी इराणवर एकाच वेळी ३० ठिकाणी हल्ले करून युद्धाला सुरुवात केली आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


या परिस्थितीचा परिणाम आता जगभरातील अनेक हवाई वाहतुकीवर होताना दिसत आहे. आज दिवसभरात ४४४ उड्डाणे रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबद्दल आज माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. 'ऑपरेशनल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) विमान कंपन्यांशी जवळून समन्वय साधत आहे', अशी माहिती त्यांनी आपल्या पोस्टद्वारे दिली.





शनिवारी मध्य-पूर्वेत पेटलेल्या संघर्षामुळे एकूण ९०० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक भारतीय कर्मचारीही येथे अडकले होते. एअर इंडियाने त्यांना यावेळी सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम केलं. शनिवारी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर ठप्प झालेल्या सेवांमध्ये इंडोगोच्या मुंबई-लंडन सेवेचाही समावेश आहे. यामुळे विमानसेवेचं भाडं वाढलं असून, आज, १ मार्चला, लंडनला जाणाऱ्या थेट तिकिटांची किंमत १.४ लाख रुपयांवर पोहचली आहे.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला