बचत योजनांचे खातेदार वाढविण्यासाठी टपाल विभागाची मोहीम

अकोला :  पोस्टाच्या विविध बचत योजनांचे खातेदार वाढविण्यासाठी अकोला टपाल कार्यालयाने मोहिम हाती घेतली आहे. त्यादरम्यान पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेची (पीओएसबी) अधिकाधिक खाती नागरिकांनी उघडावीत, असा प्रयत्न करण्यात येणार आहे.

प्रवर डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी शहरातील मुख्य टपाल कार्यालयात बुधवारी बैठक घेऊन याबाबत नियोजनाच्या सूचना केल्या. टपाल विभागाच्या बचत योजनांचे व्याजदर इतर संस्थांच्या तुलनेने अधिक आहेत. बचत खाते, आरडी, महिला सन्मान खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकासपत्र, जीवन विमा, ग्रामीण जीवन विमा अशा अनेक योजना आहेत.

या योजनांचा नागरिकांना लाभ मिळण्यासाठी दि. १३ ते १८ जानेवारीदरम्यान मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. अंभोरे यांनी केले.

बैठकीला सहायक अधीक्षक एन. एस. बावस्कार, गणेश सोनुने, वरिष्ठ पोस्टमास्तर शरद शेंडे, विपणन अधिकारी गजानन राऊत, तसेच शहरातील सर्व पोस्टमास्तर, बार्शिटाकळी, पातूर, पारस, निंबा, दहीहंडा, वाडेगाव येथील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच