बचत योजनांचे खातेदार वाढविण्यासाठी टपाल विभागाची मोहीम

  79

अकोला :  पोस्टाच्या विविध बचत योजनांचे खातेदार वाढविण्यासाठी अकोला टपाल कार्यालयाने मोहिम हाती घेतली आहे. त्यादरम्यान पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेची (पीओएसबी) अधिकाधिक खाती नागरिकांनी उघडावीत, असा प्रयत्न करण्यात येणार आहे.

प्रवर डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी शहरातील मुख्य टपाल कार्यालयात बुधवारी बैठक घेऊन याबाबत नियोजनाच्या सूचना केल्या. टपाल विभागाच्या बचत योजनांचे व्याजदर इतर संस्थांच्या तुलनेने अधिक आहेत. बचत खाते, आरडी, महिला सन्मान खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकासपत्र, जीवन विमा, ग्रामीण जीवन विमा अशा अनेक योजना आहेत.

या योजनांचा नागरिकांना लाभ मिळण्यासाठी दि. १३ ते १८ जानेवारीदरम्यान मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. अंभोरे यांनी केले.

बैठकीला सहायक अधीक्षक एन. एस. बावस्कार, गणेश सोनुने, वरिष्ठ पोस्टमास्तर शरद शेंडे, विपणन अधिकारी गजानन राऊत, तसेच शहरातील सर्व पोस्टमास्तर, बार्शिटाकळी, पातूर, पारस, निंबा, दहीहंडा, वाडेगाव येथील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या