ST Bus : महाराष्ट्राची लालपरी भाईंदरकरांवर रुसली!

पाच जिल्ह्यांंतील सेवा बंद


भाईंदर : रस्ता तेथे एसटी (ST Bus) या ब्रीद वाक्यानुसार ग्रामीण भागात लालपरी अशी ओळख असलेली राज्यातील गावोगावी सेवा देणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बससेवा भाईंदरमधून राज्यातील पाच जिल्ह्यांत जात होती. महामंडळाने हे मार्ग काही कालावधीत टप्याटप्प्याने बंद केले त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याने ती पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.



ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर हे शहर झपाट्याने वाढत असल्याने तसेच राज्यातील अनेक भागातून नागरिक शहरात स्थलांतरित झाल्याने महामंडळाने भाईंदर पश्चिम येथील डेपोतून महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, कणकवली, श्रीवर्धन, पुणे येथील स्वारगेट, कवठेमहाकाळ, चोपडा, चंदगड, तुळजापूर अशा अनेक विविध गावात बससेवा सुरू केली होती. कालांतराने एक-एक करत या सेवा बंद करण्यात आल्यामुळे प्रवासी नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


शहरातील नागरिकांना महाराष्ट्राच्या विविध शहरामध्ये जाण्यासाठी नाईलाजाने बोरिवली, ठाणे किंवा मुंबई सेंट्रल येथे जावे लागत आहे. या डेपोपर्यंत पोहचणे खूप गैरसोयीचे तसेच त्रासाचे आहे. शहरातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या बंद केलेल्या एस.टी. सेवा पूर्ववत चालू कराव्यात अशी मागणी शहरातील नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेने वेळोवेळी केली आहे. मीरा-भाईंदर शहरातील या ज्वलंत समस्याचे लवकरात लवकर निराकरण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित करून नागरिकांची गैरसोय दूर करावी असे निवेदन माजी नगरसेवक अजित पाटील यांनी सरनाईक यांना दिले आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद

निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या' मंत्र्याला धारेवर

कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या

धक्कादायक! चंद्रपुरात पतीकडून पत्नीची जिवंत जाळून हत्या; दरवाजाला कडी लावून फरार

चंद्रपूर : महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच,

Ghodbunder Accident: घोडबंदर रोडवर मोठा अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या

ठाणे: ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज सकाळी साखळी अपघाताची घटना घडली. गायमुख ट्रॅफिक चौकीसमोर, ठाणे ते मीरा रोड

जळगावमध्ये महापौर आरक्षणाची टांगती तलवार

जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण