ST Bus : महाराष्ट्राची लालपरी भाईंदरकरांवर रुसली!

पाच जिल्ह्यांंतील सेवा बंद


भाईंदर : रस्ता तेथे एसटी (ST Bus) या ब्रीद वाक्यानुसार ग्रामीण भागात लालपरी अशी ओळख असलेली राज्यातील गावोगावी सेवा देणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बससेवा भाईंदरमधून राज्यातील पाच जिल्ह्यांत जात होती. महामंडळाने हे मार्ग काही कालावधीत टप्याटप्प्याने बंद केले त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याने ती पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.



ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर हे शहर झपाट्याने वाढत असल्याने तसेच राज्यातील अनेक भागातून नागरिक शहरात स्थलांतरित झाल्याने महामंडळाने भाईंदर पश्चिम येथील डेपोतून महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, कणकवली, श्रीवर्धन, पुणे येथील स्वारगेट, कवठेमहाकाळ, चोपडा, चंदगड, तुळजापूर अशा अनेक विविध गावात बससेवा सुरू केली होती. कालांतराने एक-एक करत या सेवा बंद करण्यात आल्यामुळे प्रवासी नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


शहरातील नागरिकांना महाराष्ट्राच्या विविध शहरामध्ये जाण्यासाठी नाईलाजाने बोरिवली, ठाणे किंवा मुंबई सेंट्रल येथे जावे लागत आहे. या डेपोपर्यंत पोहचणे खूप गैरसोयीचे तसेच त्रासाचे आहे. शहरातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या बंद केलेल्या एस.टी. सेवा पूर्ववत चालू कराव्यात अशी मागणी शहरातील नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेने वेळोवेळी केली आहे. मीरा-भाईंदर शहरातील या ज्वलंत समस्याचे लवकरात लवकर निराकरण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित करून नागरिकांची गैरसोय दूर करावी असे निवेदन माजी नगरसेवक अजित पाटील यांनी सरनाईक यांना दिले आहे.

Comments
Add Comment

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, 'या' बड्या नेत्याने दिले पक्षांतराचे संकेत

मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने यंदा राज्यात दहा ठिकाणी

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात