Torres : टोरेस कंपनीच्या महाव्यवस्थापकासह तिघांना अटक!

मुंबई : मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केल्यावर गुंतवणूकदारांना आठवड्याला सहा टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून महामुंबईमध्ये (Mumbai News) विविध ठिकाणी हिऱ्यांच्या दागिन्यांचे दालन थाटणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपली सर्व दुकाने बंद करून पोबारा केला. त्यामुळे कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या हजारो नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान मंगळवारी या कंपनीच्या दादरमधील टोरेस (Torres) बँड कार्यालयातील महाव्यवस्थापकासह तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.



या प्रकरणी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या संचालकासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवलेंको, तौफिक रियाज कार्टर, तानिया कसतोवा आणि व्हॅलेंटीना कुमार अशी या पाचजणांची नावे आहेत. यातील कंपनीचा संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार यांचा समावेश आहे. अटकेनंतर या तिघांनाही मंगळवारी दुपारी स्थानिक न्यायालयाने सोमवार, १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, या गुन्ह्यांत अजून सात ते आठजणांना आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण