Torres : टोरेस कंपनीच्या महाव्यवस्थापकासह तिघांना अटक!

मुंबई : मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केल्यावर गुंतवणूकदारांना आठवड्याला सहा टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून महामुंबईमध्ये (Mumbai News) विविध ठिकाणी हिऱ्यांच्या दागिन्यांचे दालन थाटणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपली सर्व दुकाने बंद करून पोबारा केला. त्यामुळे कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या हजारो नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान मंगळवारी या कंपनीच्या दादरमधील टोरेस (Torres) बँड कार्यालयातील महाव्यवस्थापकासह तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.



या प्रकरणी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या संचालकासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवलेंको, तौफिक रियाज कार्टर, तानिया कसतोवा आणि व्हॅलेंटीना कुमार अशी या पाचजणांची नावे आहेत. यातील कंपनीचा संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार यांचा समावेश आहे. अटकेनंतर या तिघांनाही मंगळवारी दुपारी स्थानिक न्यायालयाने सोमवार, १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, या गुन्ह्यांत अजून सात ते आठजणांना आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,