CM Devendra Fadnavis : ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून होतेय ड्रग्जची देवाणघेवाण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल; पोलिसांना दिले निर्देश


नवी मुंबई : ड्रग्जने पंजाबसारखे आपले राज्यही पोखरायला सुरुवात केली आहे. वेळीच ते पोलिसांच्या लक्षात आले आहे. पोलिसांनी धडक कारवाई करत काही पेडलर्सना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीत सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन पार्सलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची देवाणघेवाण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून असे गैरव्यवहार शोधून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. ते आज नवी मुंबई येथील नशामुक्त नवीमुंबई या कार्यक्रमात बोलत होते.



दरम्यान, आजच्या या नशामुक्त नवीमुंबई या नवीन पर्वाच्या शुभारंभ प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, सुप्रसिद्ध अभिनेते आणि ड्रग्जमुक्त नवी मुंबई अभियानाचे ब्रँड अम्बॅसिडर जॉन अब्राहम (John Abhraham), आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre), महेश बाल्डी, प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील यांसह पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, दिपक साकुरे, संजय एनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी ते म्हणाले की, अतिशय महत्त्वाचं कँपेन नवी मुंबई पोलिसांनी लॉन्च केले आहे. पुन्हा मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली आणि होम मिनिस्टरची पहिली बैठक घेतली त्यावेळी ज्या मुद्द्यांवर पुढील पाच वर्ष फोकस करायचा आहे त्यामुद्द्यांचा परामर्ष मी घेत होतो,. त्यामध्ये पोलिस विभागाला सांगितलं ड्रग्ज विरुद्ध मोठी लढाई लढायची आहे.


आज आपला देश एक मजबूत देश म्हणून पुढे येत आहे. जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ही भारताची व्यवस्था झाली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वात एक बलशाली भारत आपण पाहतोय ज्याकडे कोणीच वाकड्या नजरेने पाहत नाही. मात्र आता या देशाला व्यसनाधीन कसं करता येईल हे युवा अवस्थेतच कशाप्रकारे संपवता येईल असा डाव देशात सुरु झाला. त्यानंतर देशात वेगवेगळ्या प्रकारचे अमलीपदार्थांचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला.


Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण