लांजा : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईन फुटल्याने लांजा नगरपंचायतीच्या तीन प्रभागात पाण्याची बोंबाबोंब झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून या तीनही प्रभागांमध्ये पाण्याचा थेंब न आल्याने प्रभाग क्रमांक ४, ८ आणि ९ मधील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, लांजा शहरातून जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणार्या संपादित जागेतील इमारती, दुकाने, टपर्या गुरूवारी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आल्या. गुरूवारी सकाळपासून ही कारवाई करण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तसेच राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती.चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेवर टपरीधारक, दुकानदार यांनी बस्तान बसवले होते.
तर अनेक वर्षापासून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या खांबाच्या कामाने वेग घेतल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने मागील काही दिवसांपासून वेग घेतला आहे. मात्र शहरात संपादित जागेतच अनेक ठिकाणी टपर्या, दुकाने उभारण्यात आलेली होती. तर काही ठिकाणी चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जागेतील अनेक इमारती मालकांना आणि दुकानदारांना त्यांच्या जागेचा मोबदला दिला गेलेला नसल्याने इमारती, दुकाने हलवण्याबाबत अडथळा केला जात होता. लांजा शहरातील ४७ प्रकरणात अशा प्रकारे इमारत मालकांनी आपल्या बांधकामांवर हातोडा फिरविण्यास नकार दिला होता. त्यामुळे शहरात चौपदरीकरणाचे काम रखडले होते.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…