मुंबई : महाराष्ट्रातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल २०२५ पासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यात १ एप्रिल 2025 पासून फास्टॅग बाबतच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे.
फास्टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड, क्रेडिट वा डेबिट कार्ड किंवा क्यू आर कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल.
Salman Khan : सलमानच्या सुरक्षेत वाढ! घराला बुलेटप्रूफ काच तर भिंतीवर काटेरी तार
एमएसआरडीसीच्या अखत्यारीत ५० टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात २३ टोल नाके आहेत. या नाक्यांवर फास्टॅग बाबतच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.