छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला, ९ हुतात्मा

Share

रायपूर : छत्तीसगडमधील बीजापूरमधल्या कुटरू भागात अंबेली गावाजवळ नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात जिल्हा राखीव रक्षकांपैकी (District Reserve Guard – DRG) आठ जवान आणि जवानांच्या वाहनाचा चालक असे नऊ जण हुतात्मा झाले. अनेकजण जखमी झाले. हा हल्ला सोमवारी दुपारी सव्वादोन वाजता झाला. नक्षलवाद्यांनी आयईडीचा (Improvised Explosive Device – IED) वापर करून सुरक्षा पथकाच्या वाहनाला लक्ष्य केले. हल्ल्याच्या वृत्ताला बस्तर रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांनी दुजोरा दिला आहे.

याआधी शनिवारी अबुझमाड येथील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा पथक यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत एक जिल्हा राखीव रक्षक आणि प्रधान आरक्षक सन्नू कारम हे हुतात्मा झाले. सुरक्षा पथकाने या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार केले. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक महिला नक्षलवादी होती.

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

29 minutes ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

34 minutes ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

1 hour ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago