दहा दिवसात चार लाख भाविकांनी घेतलं पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन

सोलापूर : नववर्षाचे स्वागत अन् धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने आलेल्या ३ लाख ८२ हजार १३७ भाविकांनी पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीने शनिवारी सकाळी पत्रकारांना दिली. या दहा दिवसाच्या काळात मंदिर समितीला २ कोटी ४१ लाख ५९ हजार २८७ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचेही मंदिर समितीने सांगितले.दरम्यान, एक दिवसाची ट्रिप करण्याचे फॅड वाढले आहे. त्यामुळे बहुतांश लोक सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर व गाणगापूर याठिकाणच्या धार्मिक स्थळांना भेटी देतात.


यंदा सलग सुट्ट्या अन् नववर्षानिमित्त पर्यटनासाठी हजारो लोकांनी सोलापूरला पसंती दिली.पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे पंढरपुरातील वाहतूकीवर मोठा ताण दिसून आला. हॉटेल, लॉजेस, कॉटैज व मठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली.


नववर्षाच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट केल्यामुळे मंदिराचं सौदर्य खुलले होते. पंढरपुरबरोबरच सोलापुरातील सिध्देश्वर मंदिर, अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर, गाणगापूर येथील दत्त मंदिर व तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मागील दहा ते बारा दिवसात मोठमोठया रांगा लागल्याचेही दिसून आले.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे