Swami Samarth Solapur : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १५ दिवसांत १५ लाख भाविकांना महाप्रसाद

सोलापूर : दत्त जयंतीपासून नाताळ, सलग शासकीय सुट्या, मार्गशीर्ष महिना आणि नववर्ष आरंभाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळांनी भाविकांसाठी अविरतपणे महाप्रसादाची सेवा बजावली आहे. गेल्या १५ दिवसांत सुमारे १५ लाख भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्यात आल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दिली.


अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराला लागून असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ३७ वर्षे अखंडपणे कार्यरत आहे. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या अधिपत्याखाली सेवा कार्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.



विस्तारित महाप्रसादालयासह यात्री निवास, भक्त निवास आदी स्वरूपात श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी सेवासुविधा उपलब्ध असून या सेवाकार्याने प्रभावित होऊन गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रभावित होऊन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांना दोन अद्ययावत किमती मोटारी स्नेहापोटी दिल्या होत्या. त्यांच्या पश्चात मंगेशकर कुटुंबीयांनी अन्नछत्र मंडळाबरोबर जिव्हाळा जपला आहे. अन्नछत्र मंडळाने अलीकडे गोव्यातही सेवाविस्तार केला आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी