Swami Samarth Solapur : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १५ दिवसांत १५ लाख भाविकांना महाप्रसाद

सोलापूर : दत्त जयंतीपासून नाताळ, सलग शासकीय सुट्या, मार्गशीर्ष महिना आणि नववर्ष आरंभाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळांनी भाविकांसाठी अविरतपणे महाप्रसादाची सेवा बजावली आहे. गेल्या १५ दिवसांत सुमारे १५ लाख भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्यात आल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दिली.


अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराला लागून असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ३७ वर्षे अखंडपणे कार्यरत आहे. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या अधिपत्याखाली सेवा कार्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.



विस्तारित महाप्रसादालयासह यात्री निवास, भक्त निवास आदी स्वरूपात श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी सेवासुविधा उपलब्ध असून या सेवाकार्याने प्रभावित होऊन गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रभावित होऊन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांना दोन अद्ययावत किमती मोटारी स्नेहापोटी दिल्या होत्या. त्यांच्या पश्चात मंगेशकर कुटुंबीयांनी अन्नछत्र मंडळाबरोबर जिव्हाळा जपला आहे. अन्नछत्र मंडळाने अलीकडे गोव्यातही सेवाविस्तार केला आहे.

Comments
Add Comment

प्रेमानंद महाराजांची प्रकृती खालावली; व्हिडिओ पाहून भक्त भावूक

मुंबई : वृंदावनचे संत प्रेमानंदजी महाराज यांचा एक व्हिडिओ अलीकडेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर

मुंबई महापालिकेतील संगणकांचे होणार ऑडीट

सचिन धानजी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या संगणकांचे आता लेखा परिक्षण

ब्रिटनच्या पंतप्रधानांचे मुंबईत आगमन; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

मुंबई : भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज

मुंबई मेट्रो मार्गिका-३च्या अंतिम टप्प्याचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, आचार्य अत्रे चौक ते कफ परेड चालणार मेट्रो

मुंबई: पंतप्रधान मोदी आजच्या मुंबई दौऱ्यात मुंबई मेट्रो मार्गिका-३ (Aqua Line) च्या अंतिम टप्प्याचे (टप्पा-२बी, आचार्य

लालबागचा राजा मंडळाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना ५० लाखांची मदत

मुंबई:लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५० लाखाचा

मुंबईच्या लोकसंख्येने ओलांडला १ कोटी ३० लाखांचा टप्पा, एका वर्षात ४६ हजारांची पडली भर

मुंबई (खास प्रतिनिधी) : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईची लोकसंख्या २०२५मध्ये १