Narhari Zirwal : पदभार घेताच अन्न व औषध प्रशासन मंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये!

  117

दिंडोरी : सलग चार वेळा दिंडोरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी अन्न व औषध प्रशासन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.



मुंबई येथील बीकेसी आयुक्त कार्यालयात झिरवण यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बैठकीत सचिव वाघमारे,आयुक्त नार्वेकर, विभागाचे सर्व सहकारी व उच्च पदस्थ अधिकारी तसेच खाजागी सचिव भोगे व युवा नेते गोकुळ झिरवाळ यावेळी उपस्थित होते. विभागातील कार्यालयात अपुर्या मनुष्य बळाअभावी येणाऱ्या अडचणी, तसेच नवीन जिल्हा अद्यावत कार्यालय इमारतीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी दर्जेदार पद्धतीचे सकस अन्न व औषध उपलब्ध करुन देण्याविषयीबाबतच्या संभाव्य अडचणी व त्यावर उपाययोजनास अग्रक्रमाने प्राधान्य विषयावार देण्यात आले. तसेच आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा,वसतीगृह येथील अन्न व खाद्य पदार्थ दर्जेदार उपलब्ध होण्याच्या कामी नियोजन आखणी, पोषण आहारासंदर्भात राज्यातील काही भागात निर्माण झालेल्या अडचणीमुळे आरोग्याचा प्रश्न उभा राहीला होता, त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन पारदर्शक कार्यप्रणाली राबविण्याचे आदेश नरहरी झिरवाळ यांनी दिले.


महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्हे यामधील अन्न व औषध प्रशासन विभागाला येणाऱ्या अडचणी व समस्या यांचे तातडीने निराकारण करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे आदेश मुख्य सचिव व अधिकारी यांच्या बैठकीत दिले. पदभार स्वीकारताच नामदार झिरवाळ यांनी कामाचा धडाका लावून अॕक्शन मोडमध्ये आल्याचे दाखवून दिले आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे