Kasara RPF : 'मरे'च्या आरपीएफ टीमने वाचवले व्यक्तीचे प्राण

मुंबई :  कसारा येथील मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात, अतुलनीय टीमवर्क, समर्पण आणि माणुसकी दाखवून महत्त्वाची भूमिका बजावली. कसारा येथील आरपीएफ पोस्टला अंकित गर्ग, वरिष्ठ विभाग अभियंता/पर्मनंट वे यांच्याकडून रेल्वे रुळांच्या बाजूने ११०/४२ या पोल क्रमांकाजवळ कोणीतरी पडल्याचा संदेश प्राप्त झाला.

आरपीएफचे उपनिरीक्षक राम लखन कुमार त्यांच्या टीमसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. टीमने त्वरीत कारवाई करून त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेले जेथे त्याला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, त्याच्या बॅगेची नियमित तपासणी केली असता त्या व्यक्तीचे नाव सोमनाथ एकनाथ शिंदे, इगतपुरी येथील रहिवासी आणि भांडुप युनिट क्रमांक १, ट्रॅक मेंटेनर म्हणून कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी असल्याचे उघड झाले.




शिंदे यांनी तपास पथकाला माहिती दिली की, तो ड्युटीवरून घरी परतत असताना उंबरमाळी येथे उतरला होता आणि महामार्गावर उभा असताना त्याला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून लुटले, त्यानंतर त्यांनी त्याला रेल्वे रुळालगतच्या खांबाजवळ फेकून दिले. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याला अंतर्गत जखमा आढळून आल्या आणि त्यानुसार त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. उपनिरीक्षक राम लखन कुमार, हेड कॉन्स्टेबल संतोष बागुल आणि अधिकृत वाहन चालक महिपाल पंडित यांचा समावेश असलेल्या RPF च्या टीमने एकाचा जीव वाचवण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. आरपीएफ टीम “जीवन रक्षक” या बिरुदावलीस पात्र ठरली आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या