Rajagopala Chidambaram : अणुशास्त्रज्ञ आर. चिदंबरम यांचे निधन!

मुंबई : देशातील ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ राजगोपाल चिदंबरम (Rajagopala Chidambaram) यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८८ वर्षांचे होते. चिदंबरम यांनी पहाटे ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास मुंबईच्या जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. चिदंबरम यांना १९७५ आणि १९९९ मध्ये पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.



गेल्या काही दिवसांपासून चिदंबरम यांची प्रकृती ठीक नव्हती. शास्त्रज्ञ म्हणून डॉ. चिदंबरम यांनी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून काम केले होते. तसेच १९९४-९५ दरम्यान आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. डॉ. चिदंबरम हे भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागारही होते. डॉ. चिदंबरम यांनी भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली – पोखरण-I (१९७५) आणि पोखरण-२ (१९९८) च्या चाचणी तयारीचे आयोजन.

अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराचे समर्थक, त्यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे नेतृत्व केले. डॉ. चिदंबरम यांना पद्मश्री (१९७५) आणि पद्मविभूषण (१९९९) यांच्यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी