उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी महायुतीच्या वाटेवर ?

रत्नागिरी : बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिकच राहणार असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी यांनी २४ तासातच भाषा बदलली. योग्य वेळी योग्य निर्णय असे म्हणत त्यांनी पक्ष बदलाचे संकेत दिले.



उद्धव ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी त्यांच्या भागातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राजापूर आणि लांजा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत अन्याय झाला आहे. योग्य निर्णय घ्यावा, अशी भावना उपस्थितांनी राजन साळवी यांच्यापुढे मांडली. यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असे राजन साळवींनी जाहीर केले.



निवडणुकीतील माझ्या पराभवाला कारणीभूत असलेल्यांचा शोध घेणे आवश्यक आहे; असे राजन साळवी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलले. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असे जाहीर केले.



राजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेल्या राजन साळवी यांचा शिवसेनेच्या किरण सामंत यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. किरण सामंत हे शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत.
Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी