उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी महायुतीच्या वाटेवर ?

  77

रत्नागिरी : बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिकच राहणार असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी यांनी २४ तासातच भाषा बदलली. योग्य वेळी योग्य निर्णय असे म्हणत त्यांनी पक्ष बदलाचे संकेत दिले.



उद्धव ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी त्यांच्या भागातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राजापूर आणि लांजा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत अन्याय झाला आहे. योग्य निर्णय घ्यावा, अशी भावना उपस्थितांनी राजन साळवी यांच्यापुढे मांडली. यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असे राजन साळवींनी जाहीर केले.



निवडणुकीतील माझ्या पराभवाला कारणीभूत असलेल्यांचा शोध घेणे आवश्यक आहे; असे राजन साळवी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलले. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असे जाहीर केले.



राजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेल्या राजन साळवी यांचा शिवसेनेच्या किरण सामंत यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. किरण सामंत हे शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत.
Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण