रत्नागिरी : बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिकच राहणार असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी यांनी २४ तासातच भाषा बदलली. योग्य वेळी योग्य निर्णय असे म्हणत त्यांनी पक्ष बदलाचे संकेत दिले.
उद्धव ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी त्यांच्या भागातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राजापूर आणि लांजा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत अन्याय झाला आहे. योग्य निर्णय घ्यावा, अशी भावना उपस्थितांनी राजन साळवी यांच्यापुढे मांडली. यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असे राजन साळवींनी जाहीर केले.
निवडणुकीतील माझ्या पराभवाला कारणीभूत असलेल्यांचा शोध घेणे आवश्यक आहे; असे राजन साळवी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलले. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असे जाहीर केले.
राजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेल्या राजन साळवी यांचा शिवसेनेच्या किरण सामंत यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. किरण सामंत हे शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…