Video : बुमराहशी वाद घातला आणि लगेच बाद झाला

  70

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सिडनी कसोटी सामन्यात अखेरच्या षटकात एक नाट्यपूर्ण प्रसंग घडला. जसप्रीत बुमराह शेवटच्या षटकासाठी सज्ज होत होता. तो चेंडू टाकण्यासाठी जाणार तोच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टास याने क्षुल्लक मुद्यावरून बुमराहशी वाद उकरून काढला. या वादात थोड्याच वेळात उस्मान ख्वाजा सहभागी झाला. ख्वाजा आणि बुमराह यांच्यातील वाद वाढणार तोच पंचांनी हस्तक्षेप केला. पंचांनी हस्तक्षेप करताच त्यांचा मान राखत बुमराह तातडीने गोलंदाजीसाठी रवाना झाला. यानंतर जसप्रीत बुमराहने टाकलेल्या चेंडूवर उस्मान ख्वाजा झेलबाद झाला. तो स्लीपमध्ये उभ्या असलेल्या केएल राहुलकडे झेल देऊन परतला. ख्वाजा दहा चेंडू खेळून आणि दोन धावा करून तंबूत परतला. उस्मान ख्वाजा बाद होताच भारतीय खेळाडूंनी आनंदोत्सव सुरू केला. बुमराहशी वाद उकरुन काढणाऱ्या कॉन्स्टासचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.



गरज नसताना सॅम कॉन्स्टासने बुमराहशी वाद उकरून काढला. काही वेळा हे अनावश्यक वाद लाभदायी ठरतात तर काही वेळा हानीकारक ठरतात. यावेळी कॉन्स्टासने घातलेल्या वादामुळे भारताचा फायदा झाला आणि ऑस्ट्रेलियाचे नुकसान झाले.



वादामुळे खेळावर लक्ष केंद्रीत करणे अनेक खेळाडूंना कठीण होते. यामुळेच एखादा जम बसलेला खेळाडू बाद व्हावा अथवा वेळ वाया घालवणे शक्य व्हावे यासाठी अनेकदा प्रतिस्पर्धी वाद उकरून काढतात. या प्रकारात वाद सुरू करणारा स्वतःच्या फायद्याचा विचार करून प्रतिस्पर्ध्याची हानी करण्याचा प्रयत्न करतो. सिडनी कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपत आला होता. अखेरचे षटक टाकण्यासाठी कर्णधार बुमराहने चेंडू हाती घेचला होता. बुमराह सारख्या तगड्या गोलंदाजाने कोणाला बाद करू नये यासाठी वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाने केला. पण त्यांचा प्रयत्न अपयशी झाला. बुमराहने गोलंदाजी केल आणि ऑस्ट्रेलियाचा एक फलंदाज बाद झाला.
Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल