Video : बुमराहशी वाद घातला आणि लगेच बाद झाला

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सिडनी कसोटी सामन्यात अखेरच्या षटकात एक नाट्यपूर्ण प्रसंग घडला. जसप्रीत बुमराह शेवटच्या षटकासाठी सज्ज होत होता. तो चेंडू टाकण्यासाठी जाणार तोच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टास याने क्षुल्लक मुद्यावरून बुमराहशी वाद उकरून काढला. या वादात थोड्याच वेळात उस्मान ख्वाजा सहभागी झाला. ख्वाजा आणि बुमराह यांच्यातील वाद वाढणार तोच पंचांनी हस्तक्षेप केला. पंचांनी हस्तक्षेप करताच त्यांचा मान राखत बुमराह तातडीने गोलंदाजीसाठी रवाना झाला. यानंतर जसप्रीत बुमराहने टाकलेल्या चेंडूवर उस्मान ख्वाजा झेलबाद झाला. तो स्लीपमध्ये उभ्या असलेल्या केएल राहुलकडे झेल देऊन परतला. ख्वाजा दहा चेंडू खेळून आणि दोन धावा करून तंबूत परतला. उस्मान ख्वाजा बाद होताच भारतीय खेळाडूंनी आनंदोत्सव सुरू केला. बुमराहशी वाद उकरुन काढणाऱ्या कॉन्स्टासचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.



गरज नसताना सॅम कॉन्स्टासने बुमराहशी वाद उकरून काढला. काही वेळा हे अनावश्यक वाद लाभदायी ठरतात तर काही वेळा हानीकारक ठरतात. यावेळी कॉन्स्टासने घातलेल्या वादामुळे भारताचा फायदा झाला आणि ऑस्ट्रेलियाचे नुकसान झाले.



वादामुळे खेळावर लक्ष केंद्रीत करणे अनेक खेळाडूंना कठीण होते. यामुळेच एखादा जम बसलेला खेळाडू बाद व्हावा अथवा वेळ वाया घालवणे शक्य व्हावे यासाठी अनेकदा प्रतिस्पर्धी वाद उकरून काढतात. या प्रकारात वाद सुरू करणारा स्वतःच्या फायद्याचा विचार करून प्रतिस्पर्ध्याची हानी करण्याचा प्रयत्न करतो. सिडनी कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपत आला होता. अखेरचे षटक टाकण्यासाठी कर्णधार बुमराहने चेंडू हाती घेचला होता. बुमराह सारख्या तगड्या गोलंदाजाने कोणाला बाद करू नये यासाठी वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाने केला. पण त्यांचा प्रयत्न अपयशी झाला. बुमराहने गोलंदाजी केल आणि ऑस्ट्रेलियाचा एक फलंदाज बाद झाला.
Comments
Add Comment

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर