Captain Jasprit Bumrah : सिडनी कसोटीत बुमराह भारताचा कर्णधार

  56

सामना न खेळण्याचा रोहित शर्माचा निर्णय


नवी दिल्ली : भारतीय कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे. रोहित शर्माने स्वतः हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मांने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे रोहितच्या जागी भारतीय उपकर्णधार जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.



३ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मधील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये मोठा बदल झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी जिंकला होता. त्यानंतर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले. मात्र, पुढच्या तीन सामन्यातील २ मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. एक सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे जसप्रीत बुमराहशी दिर्घ चर्चा करताना दिसले.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र