Captain Jasprit Bumrah : सिडनी कसोटीत बुमराह भारताचा कर्णधार

  40

सामना न खेळण्याचा रोहित शर्माचा निर्णय


नवी दिल्ली : भारतीय कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे. रोहित शर्माने स्वतः हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मांने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे रोहितच्या जागी भारतीय उपकर्णधार जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.



३ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मधील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये मोठा बदल झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी जिंकला होता. त्यानंतर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले. मात्र, पुढच्या तीन सामन्यातील २ मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. एक सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे जसप्रीत बुमराहशी दिर्घ चर्चा करताना दिसले.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी