Accident : कारच्या धडकेने दुचाकीवरील दीर-वहिनीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : लोहगाव परिसरात संजय पार्क रस्त्यावरुन दुचाकीवर जात असलेल्या दीर-वहिनीच्या वाहनास पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दीर-वहिनीचा दुर्दैवीरित्या मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. आशीर्वाद गोवेकर (वय-५२) आणि रेश्मा रमेश गोवेकर (वय-४७) असे या अपघातात मयत झालेल्या दीर-वहिनीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी प्रसाद गोवेकर (वय-५४, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता,पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत आशीर्वाद गोवेकर आणि रेश्मा गोवेकर यांचे नाते दीर आणि भावजय असे आहे. रेश्मा यांची तब्येत बिघडल्याने आशीर्वाद गोवेकर दुचाकीवरून त्यांना खासगी रूग्णालयात घेऊन आले होते. उपचार घेतल्यानंतर दोघे दुचाकीवरून घरी निघाले होते. आशीर्वाद आणि रेश्मा हे दोघेजण लोहगाव परिसरातील संजय पार्क परिसरातून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव कारने भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आशीर्वाद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहप्रवासी रेश्मा यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.


दरम्यान, अपघाताची माहिती होताच सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक साहेबा पोटे पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड

कोल्हापूरचा धान्य महोत्सव; ‘मिलेट रॅली’ ला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या

‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करताना ‘स्वस्थ भारत’ घडवणेही तितकेच महत्त्वाचे - उपराष्ट्रपती

- उरुळी कांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रम ८१ वा वर्धापनदिन पुणे : आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक