Accident : कारच्या धडकेने दुचाकीवरील दीर-वहिनीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : लोहगाव परिसरात संजय पार्क रस्त्यावरुन दुचाकीवर जात असलेल्या दीर-वहिनीच्या वाहनास पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दीर-वहिनीचा दुर्दैवीरित्या मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. आशीर्वाद गोवेकर (वय-५२) आणि रेश्मा रमेश गोवेकर (वय-४७) असे या अपघातात मयत झालेल्या दीर-वहिनीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी प्रसाद गोवेकर (वय-५४, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता,पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत आशीर्वाद गोवेकर आणि रेश्मा गोवेकर यांचे नाते दीर आणि भावजय असे आहे. रेश्मा यांची तब्येत बिघडल्याने आशीर्वाद गोवेकर दुचाकीवरून त्यांना खासगी रूग्णालयात घेऊन आले होते. उपचार घेतल्यानंतर दोघे दुचाकीवरून घरी निघाले होते. आशीर्वाद आणि रेश्मा हे दोघेजण लोहगाव परिसरातील संजय पार्क परिसरातून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव कारने भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आशीर्वाद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहप्रवासी रेश्मा यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.


दरम्यान, अपघाताची माहिती होताच सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक साहेबा पोटे पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,