Accident : कारच्या धडकेने दुचाकीवरील दीर-वहिनीचा दुर्दैवी मृत्यू

  58

पुणे : लोहगाव परिसरात संजय पार्क रस्त्यावरुन दुचाकीवर जात असलेल्या दीर-वहिनीच्या वाहनास पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दीर-वहिनीचा दुर्दैवीरित्या मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. आशीर्वाद गोवेकर (वय-५२) आणि रेश्मा रमेश गोवेकर (वय-४७) असे या अपघातात मयत झालेल्या दीर-वहिनीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी प्रसाद गोवेकर (वय-५४, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता,पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत आशीर्वाद गोवेकर आणि रेश्मा गोवेकर यांचे नाते दीर आणि भावजय असे आहे. रेश्मा यांची तब्येत बिघडल्याने आशीर्वाद गोवेकर दुचाकीवरून त्यांना खासगी रूग्णालयात घेऊन आले होते. उपचार घेतल्यानंतर दोघे दुचाकीवरून घरी निघाले होते. आशीर्वाद आणि रेश्मा हे दोघेजण लोहगाव परिसरातील संजय पार्क परिसरातून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव कारने भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आशीर्वाद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहप्रवासी रेश्मा यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.


दरम्यान, अपघाताची माहिती होताच सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक साहेबा पोटे पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली