सिडनी कसोटीत रोहित शर्माला वगळणार ?

सिडनी : बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीत खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातून अपयशी खेळाडूंना वगळले जाईल अशी चर्चा आहे. कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुरता अपयशी ठरला आहे. यामुळे सिडनी कसोटीत रोहित शर्मा तसेच फिट नसलेले खेळाडू आणि वाईट कामगिरी करणारे खेळाडू यांना वगळण्याचा विचार सुरू आहे.



ऑस्ट्रेलियाने बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील चार पैकी दोन कसोटी सामने जिंकले आहेत तर भारताने एक कसोटी सामना जिंकला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. यामुळे शेवटची कसोटी अनिर्णित राहिली अथवा रद्द झाली अथवा ऑस्ट्रेलियाने जिंकली तर स्पर्धा ऑस्ट्रेलियाच जिंकेल. भारताला स्पर्धा बरोबरीत सोडवण्यासाठी सिडनी कसोटी जिंकावीच लागेल. भारतासाठी जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आहे. या आणीबाणीमुळेच भारतीय संघ बॉर्डर - गावसकर ट्रॉफी २०२४ - २५ मधील आधीच्या चार कसोटींमधील कामगिरीआधारे सिडनी कसोटीचा संघ निश्चित करणार आहे. हे करताना आधीच्या चार कसोटी सामन्यांमध्ये वाईट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वगळले जाण्याची शक्यता आहे.



यशस्वी जयस्वाल, नितीश रेड्डी, केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर या भारतीय खेळाडूंनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी या भारतीय खेळाडूंनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे.



भारतीय वेळेनुसार शुक्रवार ३ जानेवारीपासून सिडनी कसोटी सुरू होत आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता सुरू होईल.



बॉर्डर - गावसकर ट्रॉफी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

  1. पहिली कसोटी, पर्थ - भारताचा २९५ धावांनी विजय - रोहित शर्मा खेळला नाही

  2. दुसरी कसोटी, अॅडलेड - ऑस्ट्रेलियाचा दहा गडी राखून विजय - रोहित शर्मा पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ६ धावा करून बाद

  3. तिसरी कसोटी, ब्रिस्बेन - अनिर्णित - रोहित शर्मा पहिल्या डावात १० धावा करून बाद

  4. चौथी कसोटी, मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा १८४ धावांनी विजय - रोहित शर्मा पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ९ धावा करून बाद


कर्णधार रोहित शर्माने बॉर्डर - गावसकर ट्रॉफी २०२४ - २५ या स्पर्धेत पहिल्या चार कसोटींमध्ये मिळून फक्त ३१ धावा केल्या आहेत.भारताचा प्रमुख फलंदाज असूनही त्याने एवढी वाईट कामगिरी केली आहे. यामुळेच रोहितला सिडनी कसोटीत खेळवावे की नाही, असा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे.
Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या