सिडनी कसोटीत रोहित शर्माला वगळणार ?

सिडनी : बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीत खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातून अपयशी खेळाडूंना वगळले जाईल अशी चर्चा आहे. कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुरता अपयशी ठरला आहे. यामुळे सिडनी कसोटीत रोहित शर्मा तसेच फिट नसलेले खेळाडू आणि वाईट कामगिरी करणारे खेळाडू यांना वगळण्याचा विचार सुरू आहे.



ऑस्ट्रेलियाने बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील चार पैकी दोन कसोटी सामने जिंकले आहेत तर भारताने एक कसोटी सामना जिंकला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. यामुळे शेवटची कसोटी अनिर्णित राहिली अथवा रद्द झाली अथवा ऑस्ट्रेलियाने जिंकली तर स्पर्धा ऑस्ट्रेलियाच जिंकेल. भारताला स्पर्धा बरोबरीत सोडवण्यासाठी सिडनी कसोटी जिंकावीच लागेल. भारतासाठी जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आहे. या आणीबाणीमुळेच भारतीय संघ बॉर्डर - गावसकर ट्रॉफी २०२४ - २५ मधील आधीच्या चार कसोटींमधील कामगिरीआधारे सिडनी कसोटीचा संघ निश्चित करणार आहे. हे करताना आधीच्या चार कसोटी सामन्यांमध्ये वाईट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वगळले जाण्याची शक्यता आहे.



यशस्वी जयस्वाल, नितीश रेड्डी, केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर या भारतीय खेळाडूंनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी या भारतीय खेळाडूंनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे.



भारतीय वेळेनुसार शुक्रवार ३ जानेवारीपासून सिडनी कसोटी सुरू होत आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता सुरू होईल.



बॉर्डर - गावसकर ट्रॉफी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

  1. पहिली कसोटी, पर्थ - भारताचा २९५ धावांनी विजय - रोहित शर्मा खेळला नाही

  2. दुसरी कसोटी, अॅडलेड - ऑस्ट्रेलियाचा दहा गडी राखून विजय - रोहित शर्मा पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ६ धावा करून बाद

  3. तिसरी कसोटी, ब्रिस्बेन - अनिर्णित - रोहित शर्मा पहिल्या डावात १० धावा करून बाद

  4. चौथी कसोटी, मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा १८४ धावांनी विजय - रोहित शर्मा पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ९ धावा करून बाद


कर्णधार रोहित शर्माने बॉर्डर - गावसकर ट्रॉफी २०२४ - २५ या स्पर्धेत पहिल्या चार कसोटींमध्ये मिळून फक्त ३१ धावा केल्या आहेत.भारताचा प्रमुख फलंदाज असूनही त्याने एवढी वाईट कामगिरी केली आहे. यामुळेच रोहितला सिडनी कसोटीत खेळवावे की नाही, असा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे.
Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.