Railway Accident : लोकलच्या फूटबोर्डवर उभं राहणं जीवावर बेतलं!

मुंबई : रेल्वे अपघातात (Railway Accident) सातत्याने वाढ होत असताना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वे अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. लोकल गर्दीसह रेल्वे प्रवासादरम्यान शिस्त आणि सुरक्षा यांच्याशी केलेली छेडछाड अनेकांच्या जीवावर बेतत आहे. असाच प्रकार मुंबईतील वडाळा स्टेशनवर घडला आहे. चालत्या लोकल ट्रेनच्या फूटबोर्डवर उभ्या असलेल्या तरुणाचा स्थानकाजवळ खांबाला धडकून जागीच मृत्यू झाला आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन घोलप (२४) असे मृत तरुणाचे नाव असून रात्रीच्या सुमारास घोलप त्याच्या मित्रांसह कॉटन ग्रीन स्टेशनहून त्याच्या घरी परतत होता. या प्रवासादरम्यान घोलप लोकलच्या फूटबोर्डवर उभं राहून प्रवास करत होता. यावेळी रात्री ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास वडाळा पूल ओलांडल्यानंतर रुळाच्या कडेला असलेल्या खांबाला घोलपचे डोके आदळले आणि या धडकेत तो रुळाच्या बाजूला पडला.


या घटनेनंतर प्रवासी आणि मृत व्यक्तीच्या मित्रांनी ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन साखळी ओढली. त्यानंतर शासकीय रेल्वे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

Comments
Add Comment

भविष्यातील मुंबईसाठी ४८ हजार कोटींचा 'पाया'!

'एमएमआरडीए'चा अर्थसंकल्प सादर; मेट्रो, भुयारी मार्ग आणि 'मुंबई ३.०'वर भर, ८७ टक्के तरतूद पायाभूत

एमएमआरडीएचा २०१७–१८ नंतर प्रथमच अधिशेष अर्थसंकल्प

₹४८,०७२.५७ कोटींच्या आराखड्यामुळे आर्थिक परिवर्तनाचा नवा टप्पा आणि पायाभूत सुविधांना गती प्रकल्पांसाठी ८७%

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प!

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली आहे. हे

प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार; मंत्री मंगलप्रभात लोढा

याबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजय कुमार यांची घेतली भेट मुंबई

पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये मुंबई : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन

ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी; मंत्री भरत गोगावले यांचे विधान 

'सक्षम २०२५-२६' अभियानाचा समारोप मुंबई : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण