Railway Accident : लोकलच्या फूटबोर्डवर उभं राहणं जीवावर बेतलं!

मुंबई : रेल्वे अपघातात (Railway Accident) सातत्याने वाढ होत असताना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वे अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. लोकल गर्दीसह रेल्वे प्रवासादरम्यान शिस्त आणि सुरक्षा यांच्याशी केलेली छेडछाड अनेकांच्या जीवावर बेतत आहे. असाच प्रकार मुंबईतील वडाळा स्टेशनवर घडला आहे. चालत्या लोकल ट्रेनच्या फूटबोर्डवर उभ्या असलेल्या तरुणाचा स्थानकाजवळ खांबाला धडकून जागीच मृत्यू झाला आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन घोलप (२४) असे मृत तरुणाचे नाव असून रात्रीच्या सुमारास घोलप त्याच्या मित्रांसह कॉटन ग्रीन स्टेशनहून त्याच्या घरी परतत होता. या प्रवासादरम्यान घोलप लोकलच्या फूटबोर्डवर उभं राहून प्रवास करत होता. यावेळी रात्री ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास वडाळा पूल ओलांडल्यानंतर रुळाच्या कडेला असलेल्या खांबाला घोलपचे डोके आदळले आणि या धडकेत तो रुळाच्या बाजूला पडला.


या घटनेनंतर प्रवासी आणि मृत व्यक्तीच्या मित्रांनी ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन साखळी ओढली. त्यानंतर शासकीय रेल्वे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन