Railway Accident : लोकलच्या फूटबोर्डवर उभं राहणं जीवावर बेतलं!

  77

मुंबई : रेल्वे अपघातात (Railway Accident) सातत्याने वाढ होत असताना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वे अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. लोकल गर्दीसह रेल्वे प्रवासादरम्यान शिस्त आणि सुरक्षा यांच्याशी केलेली छेडछाड अनेकांच्या जीवावर बेतत आहे. असाच प्रकार मुंबईतील वडाळा स्टेशनवर घडला आहे. चालत्या लोकल ट्रेनच्या फूटबोर्डवर उभ्या असलेल्या तरुणाचा स्थानकाजवळ खांबाला धडकून जागीच मृत्यू झाला आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन घोलप (२४) असे मृत तरुणाचे नाव असून रात्रीच्या सुमारास घोलप त्याच्या मित्रांसह कॉटन ग्रीन स्टेशनहून त्याच्या घरी परतत होता. या प्रवासादरम्यान घोलप लोकलच्या फूटबोर्डवर उभं राहून प्रवास करत होता. यावेळी रात्री ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास वडाळा पूल ओलांडल्यानंतर रुळाच्या कडेला असलेल्या खांबाला घोलपचे डोके आदळले आणि या धडकेत तो रुळाच्या बाजूला पडला.


या घटनेनंतर प्रवासी आणि मृत व्यक्तीच्या मित्रांनी ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन साखळी ओढली. त्यानंतर शासकीय रेल्वे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र