काँग्रेसला वाल्मिक कराडच्या जीवाची काळजी

चंद्रपूर : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराडची पोलीस चौकशी करत आहेत. पण काँग्रेस नेत्यांना हत्येचा संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या जीवाची काळजी सतावत आहे. काही काँग्रेस नेत्यांची झोप वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असल्यापासून उडाल्याचे वृत्त आहे.



मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, अशी माहिती बड्या अधिकाऱ्याकडून मिळाल्याचा दावा काँग्रेस नेते विजय विजय वडेट्टीवार यांनी केला. वाल्मिक कराड ज्या पोलीस ठाण्यात आहे त्याच पोलीस ठाण्यात पाच पलंग मागवण्यात आले आहेत. ही वाल्मिक कराडचे लाड पुरवण्याची सुरुवात आहे. लवकरच त्याच्यासाठी एसी, फ्रीज, टीव्ही हे पण मागवले जाईल; असाही दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. सरपंच हत्या प्रकरणात निःपक्षपाती चौकशी होणार नाही, अशीही भीती विजय विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. वेगवेगळे दावे आणि तर्कवितर्क करताना विजय वडेट्टीवार यांनी एकही ठोस पुरावा सादर केलेला नाही.



कोण आहे वाल्मिक कराड ?

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपास संशयित आरोपी वाल्मिक कराड याचा पोलीस शोध घेत होते. आता पोलिसांच्या तावडीतून सुटका नाही आणि फार काळ बाहेर राहणे शक्य नाही याची जाणीव झाल्यानंतर वाल्मिक कराड शरण आला. सध्या वाल्मिक कराड पोलीस कोठडीत आहे. वाल्मिक कराड हा गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असलेला आरोपी आहे. कराड विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये