काँग्रेसला वाल्मिक कराडच्या जीवाची काळजी

  104

चंद्रपूर : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराडची पोलीस चौकशी करत आहेत. पण काँग्रेस नेत्यांना हत्येचा संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या जीवाची काळजी सतावत आहे. काही काँग्रेस नेत्यांची झोप वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असल्यापासून उडाल्याचे वृत्त आहे.



मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, अशी माहिती बड्या अधिकाऱ्याकडून मिळाल्याचा दावा काँग्रेस नेते विजय विजय वडेट्टीवार यांनी केला. वाल्मिक कराड ज्या पोलीस ठाण्यात आहे त्याच पोलीस ठाण्यात पाच पलंग मागवण्यात आले आहेत. ही वाल्मिक कराडचे लाड पुरवण्याची सुरुवात आहे. लवकरच त्याच्यासाठी एसी, फ्रीज, टीव्ही हे पण मागवले जाईल; असाही दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. सरपंच हत्या प्रकरणात निःपक्षपाती चौकशी होणार नाही, अशीही भीती विजय विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. वेगवेगळे दावे आणि तर्कवितर्क करताना विजय वडेट्टीवार यांनी एकही ठोस पुरावा सादर केलेला नाही.



कोण आहे वाल्मिक कराड ?

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपास संशयित आरोपी वाल्मिक कराड याचा पोलीस शोध घेत होते. आता पोलिसांच्या तावडीतून सुटका नाही आणि फार काळ बाहेर राहणे शक्य नाही याची जाणीव झाल्यानंतर वाल्मिक कराड शरण आला. सध्या वाल्मिक कराड पोलीस कोठडीत आहे. वाल्मिक कराड हा गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असलेला आरोपी आहे. कराड विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक