Lonavla Ekvira Temple : बंदी असतानाही मुंबईकरांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे मधमाशांचा भक्तांवर हल्ला

लोणावळा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांनी समुद्रकिनारी गर्दी केली तर काहींनी नवीन वर्षाची सुरुवात देवदेवतांच्या दर्शनाने केली. लोणावळ्याच्या एकविरा मंदिरातही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. अशातच काल एकविरा गडावर काही हुल्लडबाजांनी फटाके फोडल्याने मधमाशांनी तिथे असलेल्या भाविकांवर हल्ला केला.



मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि १) रोजी मुंबईच्या कुलाबा येथून दर्शनाला आलेल्या काही हुल्लडबाजांनी एकविरा गडावर कलर धुराचे फटाके फोडले. फटाक्याच्या धुराने मधमाशां इजा झाली. त्या मधमाशा सर्वत्र पसरल्या आणि गडावर आलेल्या भाविकांवर त्यांनी हल्ला केला. या माशांच्या हल्ल्याने या मुंबईकरांसह अन्य भाविकही जखमी झाले आहेत. लोणावळ्यातील एकविरा गडावर हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचेचे फटाके लावले. फटाक्यांमुळे मधमाशांच्या पोळाला इजा पोहचताच मधमाशांनी भविकांवर हल्लाबोल करत चावा घेतला. यात अनेक भाविकांची पळापळ झाली. मधमाशांनी काही भाविकांना दंश केला. यात लहान मुलांचा देखील समावेश होता. या सर्वांना तातडीने तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींवर तातडीने उपचार करून काहींना सोडून दिले. तर ज्यांची प्रकृती गंभीर होती अशाना काही काळ निरिक्षणाखाली ठेवून त्यांनाही घरी सोडण्यात आले आणि आराम करण्याचा सल्ला दिला.



मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती, त्या पालखीतल्या काही भक्तांनी फटाके वाजवले. त्याचा फटका बाकीच्या भक्तांनाही बसला. मात्र गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असतानाही काही भाविक याकडे दुर्लक्ष करतात. एकविरा गडावर फटाका बंदी कायम असावी, अशी मागणी कार्ला एकविरा ग्रामस्थ अशोक कुटे यांनी केली आहे.


याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य