Pune Grand Army Day : पुण्यात साजरा होणार भव्य आर्मी डे!

  153

पुणे : भारतीय सैन्यदलाचा ७७ वा वर्धापन दिन यंदा पुण्यात साजरा होत आहे. यानिमित्त आळंदी रस्त्यावरील बॉम्बे सॅपर्स या लष्करी संस्थेच्या मैदानावर भव्य कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त ३ ते १५ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत.


भारत देश स्वतंत्र होताच १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी ले. जन. के. एम. करिअप्पा यांची निवड झाली. तेव्हापासून १५ जानेवारी हा भारतीय लष्कराचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. शहरात १५ जानेवारी रोजी होणार्‍या कार्यक्रमास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.



दक्षिण कमांड येथे ३ ते ५ जानेवारीदरम्यान आर्मी मेळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत प्रवेश खुला राहणार आहे. आळंदी रस्त्यावरील बॉम्बे सॅपर्स या सैन्यदलाच्या मैदानावर लष्कराच्या वतीने संचलनासह अत्याधुनिक शस्त्रांंचे विलोभनीय दर्शन होणार आहे. तसेच, लष्कराच्या वतीने मिशन ऑलिम्पिकसारखे सजीव देखावे साकारणारे रथ या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या