जेव्हा भारतीय कर्णधाराने मेलबर्न कसोटीनंतर घेतली होती निवृत्ती...१० वर्षांनी पुन्हा तेच होणार?

  38

मुंबई : भारतीय संघ(team india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील चौथा सामना मेलबर्नमध्ये झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी जिंकला. यामुळे यजमान संघ पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. भारतीय संघाला विजयासाठी ३४० धावांचे आव्हान मिळाले होते.


या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तिबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की रोहित सिडनी सामन्यानंतर निवृत्ती घेईल. हे असेच वातावरण याआधीही होते. १० वर्षांपूर्वी मेलबर्न कसोटीनंतर असेच वातावरण बनले होते. तेव्हा भारताचा कर्णधार असलेला महेंद्रसिंग धोनीने सामन्यानंतर कसोटीतून निवृत्ती घेतली होती.



धोनीने ३० डिसेंबर २०१४मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली होती. तेव्हा शेवटच्या कसोटीसाठी विराट कोहलीच्या हातात कमान सोपवण्यात आली होती. आताही असेच काहीसे वातावरण झाले आहे. फरक इतकाच आहे की भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटी अनिर्णीत झाली होती. यानंतर धोनीने निवृत्तीची घोषणा केली होती.


मात्र यावेळेस मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला आहे. तर कर्णधार रोहितने निवृत्ती घेतली आहे. मात्र वातावरण तसेच काहीतरी बनत आहे. कर्णधाराच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. २००५मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने आपल्या ९ वर्षांच्या करिअरमध्ये ९० कसोटी सामने खेळले. यात ६ शतके आणि ३३ अर्धशतके ठोकली. यात त्याने ४८७६ धावा केल्या.


धोनीने ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यात २७ कसोटी सामने जिंकले. अखेरीस धोनीने १५ ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला