जेव्हा भारतीय कर्णधाराने मेलबर्न कसोटीनंतर घेतली होती निवृत्ती...१० वर्षांनी पुन्हा तेच होणार?

मुंबई : भारतीय संघ(team india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील चौथा सामना मेलबर्नमध्ये झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी जिंकला. यामुळे यजमान संघ पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. भारतीय संघाला विजयासाठी ३४० धावांचे आव्हान मिळाले होते.


या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तिबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की रोहित सिडनी सामन्यानंतर निवृत्ती घेईल. हे असेच वातावरण याआधीही होते. १० वर्षांपूर्वी मेलबर्न कसोटीनंतर असेच वातावरण बनले होते. तेव्हा भारताचा कर्णधार असलेला महेंद्रसिंग धोनीने सामन्यानंतर कसोटीतून निवृत्ती घेतली होती.



धोनीने ३० डिसेंबर २०१४मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली होती. तेव्हा शेवटच्या कसोटीसाठी विराट कोहलीच्या हातात कमान सोपवण्यात आली होती. आताही असेच काहीसे वातावरण झाले आहे. फरक इतकाच आहे की भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटी अनिर्णीत झाली होती. यानंतर धोनीने निवृत्तीची घोषणा केली होती.


मात्र यावेळेस मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला आहे. तर कर्णधार रोहितने निवृत्ती घेतली आहे. मात्र वातावरण तसेच काहीतरी बनत आहे. कर्णधाराच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. २००५मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने आपल्या ९ वर्षांच्या करिअरमध्ये ९० कसोटी सामने खेळले. यात ६ शतके आणि ३३ अर्धशतके ठोकली. यात त्याने ४८७६ धावा केल्या.


धोनीने ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यात २७ कसोटी सामने जिंकले. अखेरीस धोनीने १५ ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Comments
Add Comment

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या