जेव्हा भारतीय कर्णधाराने मेलबर्न कसोटीनंतर घेतली होती निवृत्ती...१० वर्षांनी पुन्हा तेच होणार?

मुंबई : भारतीय संघ(team india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील चौथा सामना मेलबर्नमध्ये झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी जिंकला. यामुळे यजमान संघ पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. भारतीय संघाला विजयासाठी ३४० धावांचे आव्हान मिळाले होते.


या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तिबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की रोहित सिडनी सामन्यानंतर निवृत्ती घेईल. हे असेच वातावरण याआधीही होते. १० वर्षांपूर्वी मेलबर्न कसोटीनंतर असेच वातावरण बनले होते. तेव्हा भारताचा कर्णधार असलेला महेंद्रसिंग धोनीने सामन्यानंतर कसोटीतून निवृत्ती घेतली होती.



धोनीने ३० डिसेंबर २०१४मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली होती. तेव्हा शेवटच्या कसोटीसाठी विराट कोहलीच्या हातात कमान सोपवण्यात आली होती. आताही असेच काहीसे वातावरण झाले आहे. फरक इतकाच आहे की भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटी अनिर्णीत झाली होती. यानंतर धोनीने निवृत्तीची घोषणा केली होती.


मात्र यावेळेस मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला आहे. तर कर्णधार रोहितने निवृत्ती घेतली आहे. मात्र वातावरण तसेच काहीतरी बनत आहे. कर्णधाराच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. २००५मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने आपल्या ९ वर्षांच्या करिअरमध्ये ९० कसोटी सामने खेळले. यात ६ शतके आणि ३३ अर्धशतके ठोकली. यात त्याने ४८७६ धावा केल्या.


धोनीने ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यात २७ कसोटी सामने जिंकले. अखेरीस धोनीने १५ ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना