कोकण रेल्वेमार्गावर धावणार उत्सव विशेष एक्स्प्रेस गाडी

रत्नागिरी : कोकण मार्गावरून हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली) ते तिरुवनंतपुरम सेंट्रल आणि परत या मार्गावर आरक्षित उत्सव विशेष एक्स्प्रेस विशेष रेल्वेगाडी धावणार आहे.


नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकण, गोवा आणि दक्षिण भारतात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षित तिकीट मिळणे कठीण झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन आरक्षित उत्सव विशेष एक्स्प्रेस धावणार आहे.


गाडी क्रमांक ०४०८२ हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम सेंट्रल आरक्षित उत्सव विशेष रेल्वेगाडी हजरत निजामुद्दीन येथून २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.२० वाजता सुटेल. ही गाडी तिरुअनंतपुरम सेंट्रलला तिसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०४०८१ तिरुअनंतपुरम सेंट्रलहून ही आरक्षित उत्सव विशेष रेल्वेगाडी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७.५० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल. या गाडीला कोकण आणि गोव्यात वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, थिवी आणि मडगाव येथे थांबे असतील. गाडीला एकूण १९ एलएचबी डबे असतील.

Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी