नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न! सोलापूर विमानतळ कधी सुरु होणार? विमान कंपनीस हवेय सवलतीच्या दरात इंधन

सोलापूर : 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न', हा वाक्प्रचार आपल्याकडे चांगलाच रूढ आहे. सध्या सोलापूर विमानतळाचेही (Solapur airport) कामकाज या वाक्प्रचाराप्रमाणे चालले आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने न चालण्याबाबत काही न काही बहाणे शोधणात पटाईत असलेल्या प्रशासनाने आता इंधनाचा नवा बहाणा शोधला आहे.


'फ्लाय ९१' या कंपनीकडून गोवा ते सोलापूर व सोलापूर ते मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी २३ डिसेंबरचा मुहूर्त जाहीर केला होता. मात्र, इंधनाच्या सुविधेचे निमित्त करत हा मुहूर्त आता जानेवारीत ढकलला आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून या मागणीची पूर्तता झाल्यानंतरच सेवा सुरू होईल, अशी माहिती विमानतळाच्या सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली.


याआधी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याचा मुख्य अडथळा असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे निर्देश दिले होते. सदर चिमणी पाडल्यानंतर आता साखर कारख्यानाचा दुसरा हंगाम देखिल सुरू झाला. तरी अद्यापही सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झालेली नाही.



१५ जून २०२३ रोजी चिमणी पाडण्यात आली. त्यानंतर यंदाचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, विमानसेवा सुरू होण्यासाठी असलेल्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयकडून (डीजीसीए) आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी बराच काळ यामध्ये गेला.


विमानतळावरील विविध दुरुस्त्या आणि नूतनीकरणासाठी सुमारे १६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता विमानतळावर टॅंकरद्वारे इंधन आणून विमानात भरण्यासाठीदेखील पेट्रोलियम मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे जानेवारीत तरी सोलापूर विमानतळ (Solapur airport) सुरु होईल का, असा सोलापूरकरांना प्रश्न पडला आहे.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी