नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न! सोलापूर विमानतळ कधी सुरु होणार? विमान कंपनीस हवेय सवलतीच्या दरात इंधन

  144

सोलापूर : 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न', हा वाक्प्रचार आपल्याकडे चांगलाच रूढ आहे. सध्या सोलापूर विमानतळाचेही (Solapur airport) कामकाज या वाक्प्रचाराप्रमाणे चालले आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने न चालण्याबाबत काही न काही बहाणे शोधणात पटाईत असलेल्या प्रशासनाने आता इंधनाचा नवा बहाणा शोधला आहे.


'फ्लाय ९१' या कंपनीकडून गोवा ते सोलापूर व सोलापूर ते मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी २३ डिसेंबरचा मुहूर्त जाहीर केला होता. मात्र, इंधनाच्या सुविधेचे निमित्त करत हा मुहूर्त आता जानेवारीत ढकलला आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून या मागणीची पूर्तता झाल्यानंतरच सेवा सुरू होईल, अशी माहिती विमानतळाच्या सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली.


याआधी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याचा मुख्य अडथळा असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे निर्देश दिले होते. सदर चिमणी पाडल्यानंतर आता साखर कारख्यानाचा दुसरा हंगाम देखिल सुरू झाला. तरी अद्यापही सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झालेली नाही.



१५ जून २०२३ रोजी चिमणी पाडण्यात आली. त्यानंतर यंदाचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, विमानसेवा सुरू होण्यासाठी असलेल्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयकडून (डीजीसीए) आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी बराच काळ यामध्ये गेला.


विमानतळावरील विविध दुरुस्त्या आणि नूतनीकरणासाठी सुमारे १६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता विमानतळावर टॅंकरद्वारे इंधन आणून विमानात भरण्यासाठीदेखील पेट्रोलियम मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे जानेवारीत तरी सोलापूर विमानतळ (Solapur airport) सुरु होईल का, असा सोलापूरकरांना प्रश्न पडला आहे.

Comments
Add Comment

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक