नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न! सोलापूर विमानतळ कधी सुरु होणार? विमान कंपनीस हवेय सवलतीच्या दरात इंधन

  177

सोलापूर : 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न', हा वाक्प्रचार आपल्याकडे चांगलाच रूढ आहे. सध्या सोलापूर विमानतळाचेही (Solapur airport) कामकाज या वाक्प्रचाराप्रमाणे चालले आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने न चालण्याबाबत काही न काही बहाणे शोधणात पटाईत असलेल्या प्रशासनाने आता इंधनाचा नवा बहाणा शोधला आहे.


'फ्लाय ९१' या कंपनीकडून गोवा ते सोलापूर व सोलापूर ते मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी २३ डिसेंबरचा मुहूर्त जाहीर केला होता. मात्र, इंधनाच्या सुविधेचे निमित्त करत हा मुहूर्त आता जानेवारीत ढकलला आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून या मागणीची पूर्तता झाल्यानंतरच सेवा सुरू होईल, अशी माहिती विमानतळाच्या सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली.


याआधी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याचा मुख्य अडथळा असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे निर्देश दिले होते. सदर चिमणी पाडल्यानंतर आता साखर कारख्यानाचा दुसरा हंगाम देखिल सुरू झाला. तरी अद्यापही सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झालेली नाही.



१५ जून २०२३ रोजी चिमणी पाडण्यात आली. त्यानंतर यंदाचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, विमानसेवा सुरू होण्यासाठी असलेल्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयकडून (डीजीसीए) आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी बराच काळ यामध्ये गेला.


विमानतळावरील विविध दुरुस्त्या आणि नूतनीकरणासाठी सुमारे १६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता विमानतळावर टॅंकरद्वारे इंधन आणून विमानात भरण्यासाठीदेखील पेट्रोलियम मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे जानेवारीत तरी सोलापूर विमानतळ (Solapur airport) सुरु होईल का, असा सोलापूरकरांना प्रश्न पडला आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ