Tuljapur News : बीड प्रकरणाची पुनरावृत्ती! तुळजापूरच्या सरपंचावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

तुळजापूर : काही दिवसांपूर्वी बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काल रायगड जिल्ह्यामध्ये अशीच घटना घडल्याचे समोर आले होते. तर आता तुळजापूरमध्ये बीड प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे उघडकीस आले आहे. तुळजापूर तालुक्यातील सरपंचाला गावगुंडांकडून थेट जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न ऐरवणीवर आला आहे.



तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास बारुळ गावाजवळ ही घटना घडली. मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम त्यांच्या भावासह मध्यरात्री गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकून, दगडांनी काचा फोडून तसेच गाडीत पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. या हल्ल्यामध्ये सरपंच नामदेव निकम थोडक्यात बचावले आहेत.


दरम्यान, पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच याप्रकरणी पोलिस कारवाई करत असून गुन्हेगारांना बेड्या कधी ठोकणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार - मुख्यमंत्री

दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार लातूर : राज्यात अनेक ठिकाणी

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही सोलापूर :

याला म्हणतात जिगरबाज! ७६ वर्षांचा गुराखी वाघाशी भिडला आणि जिंकला!

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील चिरेपल्ली बीट परिसरात ७६ वर्षांच्या गुराख्याने

Solapur Flood : पहिला महामार्ग बंद अन् आता 'वंदे भारत'लाही फटका...सीना नदीच्या पुरामुळे सोलापूरमध्ये पूरस्थिती गंभीर

सोलापूर : राज्यात पावसाने जोर धरल्यामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. सोलापुर जिल्ह्यातील

Devendra Fadanvis : अतिवृष्टीने माढ्यात शेतीचं मोठं नुकसान, मुख्यमंत्री फडणवीसांची थेट पाहणी, मदतीचे आश्वासन

सोलापूर : महाराष्ट्रात पावसाचा तुफान थैमान सुरू असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली