Tuljapur News : बीड प्रकरणाची पुनरावृत्ती! तुळजापूरच्या सरपंचावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

तुळजापूर : काही दिवसांपूर्वी बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काल रायगड जिल्ह्यामध्ये अशीच घटना घडल्याचे समोर आले होते. तर आता तुळजापूरमध्ये बीड प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे उघडकीस आले आहे. तुळजापूर तालुक्यातील सरपंचाला गावगुंडांकडून थेट जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न ऐरवणीवर आला आहे.



तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास बारुळ गावाजवळ ही घटना घडली. मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम त्यांच्या भावासह मध्यरात्री गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकून, दगडांनी काचा फोडून तसेच गाडीत पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. या हल्ल्यामध्ये सरपंच नामदेव निकम थोडक्यात बचावले आहेत.


दरम्यान, पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच याप्रकरणी पोलिस कारवाई करत असून गुन्हेगारांना बेड्या कधी ठोकणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

४ दशकांची प्रतीक्षा संपणार; कोल्हापूर–कोकण रेल्वेने जोडले जाणार

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाचा मार्ग

बदलापूरमध्ये अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; ४०० हून अधिक बांधकामे हटवणार

बदलापूर : नगरपालिका निवडणुकांनंतर बदलापूर शहरात प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून, अनधिकृत बांधकामांविरोधात

Accident News : कोंडाईबारी घाटात लालपरीचा भीषण अपघात, दोन कंटेनरमध्ये बसचा अक्षरशः चुराडा, १५ प्रवाशांचा जीव...

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात आज एका भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. विसरवाडी पोलीस चौकी

पुण्यात मेट्रोच्या विस्ताराला गती, हिंजवडी पिंपरी पासून .. कुठून कसा असेल मार्ग? जाणून घ्या...

पुणे : पुणेकरांचा प्रवास आता लवकरच आरामदायी होणार आहे. कारण पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन लवकरच

बुलढाण्यात बिबट्याची दहशत.. घराबाहेर आला अन् थेट व्हायरल व्हिडीओने खळबळ

बुलढाणा : गेले काही महिने बिबट्याने महाराष्ट्रभर उच्छाद मांडला आहे. शांततेच्या ठिकाणी दिसणार बिबट्या आता सर्रास

Mumbai University Exams: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखेत बदल; आता 'या' तारखांना होणार परीक्षा

मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर