Tuljapur News : बीड प्रकरणाची पुनरावृत्ती! तुळजापूरच्या सरपंचावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

  81

तुळजापूर : काही दिवसांपूर्वी बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काल रायगड जिल्ह्यामध्ये अशीच घटना घडल्याचे समोर आले होते. तर आता तुळजापूरमध्ये बीड प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे उघडकीस आले आहे. तुळजापूर तालुक्यातील सरपंचाला गावगुंडांकडून थेट जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न ऐरवणीवर आला आहे.



तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास बारुळ गावाजवळ ही घटना घडली. मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम त्यांच्या भावासह मध्यरात्री गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकून, दगडांनी काचा फोडून तसेच गाडीत पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. या हल्ल्यामध्ये सरपंच नामदेव निकम थोडक्यात बचावले आहेत.


दरम्यान, पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच याप्रकरणी पोलिस कारवाई करत असून गुन्हेगारांना बेड्या कधी ठोकणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला. आता अजित पवारांचा

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा