धस यांच्या रडारवर पुन्हा 'आका'; एकाच व्यक्तीच्या खात्यातून ९०० कोटींचा व्यवहार! दोन पोलीस अधिकारीही गुंतल्याचा आरोप

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सातत्याने लक्ष्य करणारे भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पोलीस अधीक्षकांकडे आपली चिंता व्यक्त केली. महादेव बेटिंग ऍपच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप धस यांनी केला आणि त्याच्या चौकशीची मागणी केली.


धस यांनी सांगितले की, माझ्या मतदारसंघातील टेंभुर्णी गावात एका व्यक्तीच्या खात्यातून ९ अब्ज रुपयांचा व्यवहार झाला आहे. १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार असल्यास ईडीकडून चौकशी होण्याची पद्धत आहे. इथे ९०० कोटी रुपयांचे प्रकरण आहे, त्यामुळे यावर ईडीची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच, या प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावं धस यांनी पोलीस अधीक्षकांना दिली आणि सांगितले की, चांगलं काम करणारे अधिकारी बाजूला सारले गेले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे मलेशियापर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले. महादेव बेटिंग ऍप प्रकरणातसुद्धा आकाचा हात असावा, असा संशय आमदार धस यांनी व्यक्त केला.



धस यांनी पुढे दावा केला की, बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर सारख्या घटनांचा उगम झाला आहे. "बीडजवळ अनेक जमिनींच्या खरेदीची माहिती समोर येत आहे. परळी बाजार समितीच्या गाळ्यांचं उद्घाटन तीन वर्षांपासून लांबले आहे, कारण ते गायरान जमिनीवर उभारले आहेत. आकाच्या कार्यकर्त्यांनी १४०० एकर गायरान जमीन बळकावली आहे आणि त्यावर ६०० वीटभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत, त्यातील ३०० अनधिकृत आहेत," असे धस यांनी म्हटले. आकांचे असे उद्योग आता हळूहळू पुढे येऊ लागले आहेत,' अशा शब्दांत धस यांनी आकांची कुंडलीच मांडली.


याशिवाय, धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, "धनुभाऊ, तुमचं विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं आहे. आमचं लेकरु गेलं आहे, त्याला न्याय द्यायचा आहे. तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न होतोय, ही काही राजकीय बाब नाही. या मोर्चात वंजारी समाजाचे लोक आणि मुस्लिम लोक देखिल सहभागी होणार आहेत," असे ते म्हणाले.


बीड जिल्ह्यात 'आकां'ची १०० ते १५० एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत ३० ते ४० कोटी रुपयांचे बंधारे बांधून घेतले आहेत. 'आकां'कडे पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून? असा सवालही धस यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.

Kolhapur Fire : आजऱ्यात पहाटे अग्नितांडव! ७ गाड्यांसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. या आकस्मिक

राज्य सेवा आयोगाची मेगाभरती! जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि जागा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत चर्चा सुरू असुन भरतीच्या