धस यांच्या रडारवर पुन्हा 'आका'; एकाच व्यक्तीच्या खात्यातून ९०० कोटींचा व्यवहार! दोन पोलीस अधिकारीही गुंतल्याचा आरोप

  146

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सातत्याने लक्ष्य करणारे भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पोलीस अधीक्षकांकडे आपली चिंता व्यक्त केली. महादेव बेटिंग ऍपच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप धस यांनी केला आणि त्याच्या चौकशीची मागणी केली.


धस यांनी सांगितले की, माझ्या मतदारसंघातील टेंभुर्णी गावात एका व्यक्तीच्या खात्यातून ९ अब्ज रुपयांचा व्यवहार झाला आहे. १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार असल्यास ईडीकडून चौकशी होण्याची पद्धत आहे. इथे ९०० कोटी रुपयांचे प्रकरण आहे, त्यामुळे यावर ईडीची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच, या प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावं धस यांनी पोलीस अधीक्षकांना दिली आणि सांगितले की, चांगलं काम करणारे अधिकारी बाजूला सारले गेले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे मलेशियापर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले. महादेव बेटिंग ऍप प्रकरणातसुद्धा आकाचा हात असावा, असा संशय आमदार धस यांनी व्यक्त केला.



धस यांनी पुढे दावा केला की, बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर सारख्या घटनांचा उगम झाला आहे. "बीडजवळ अनेक जमिनींच्या खरेदीची माहिती समोर येत आहे. परळी बाजार समितीच्या गाळ्यांचं उद्घाटन तीन वर्षांपासून लांबले आहे, कारण ते गायरान जमिनीवर उभारले आहेत. आकाच्या कार्यकर्त्यांनी १४०० एकर गायरान जमीन बळकावली आहे आणि त्यावर ६०० वीटभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत, त्यातील ३०० अनधिकृत आहेत," असे धस यांनी म्हटले. आकांचे असे उद्योग आता हळूहळू पुढे येऊ लागले आहेत,' अशा शब्दांत धस यांनी आकांची कुंडलीच मांडली.


याशिवाय, धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, "धनुभाऊ, तुमचं विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं आहे. आमचं लेकरु गेलं आहे, त्याला न्याय द्यायचा आहे. तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न होतोय, ही काही राजकीय बाब नाही. या मोर्चात वंजारी समाजाचे लोक आणि मुस्लिम लोक देखिल सहभागी होणार आहेत," असे ते म्हणाले.


बीड जिल्ह्यात 'आकां'ची १०० ते १५० एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत ३० ते ४० कोटी रुपयांचे बंधारे बांधून घेतले आहेत. 'आकां'कडे पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून? असा सवालही धस यांनी केला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले