मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही – मुख्यमंत्री

मनोज जरांगेच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचे सडेतोड प्रत्युत्तर


नागपूर: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे यांनी, आता खरी मजा येईल हिशेब चुकता करायची आता बघू आरक्षण देतात की, नाही असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही असा टोला लगावला आहे. ते आज, बुधवारी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.


मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नरत आहेत. यासंदर्भात अजून ठोस निर्णय झालेला नाही. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आहेत. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे परभणी येथे कुणाचेही नाव न घेता म्हणाले की, “आता खरी मजा आहे, हिशेब चुकता करण्याची. आधी ते दुसऱ्यांवर ढकलत होते. पण आता कळेल की आरक्षण देतात की नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय संपल्यानंतर मी शेतकऱ्यांचा विषय हातात घेणार आहे.



शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर कसे देत नाहीत आणि धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचाही प्रश्न कसा मार्गी लागत नाही ? तेही मी पाहतो. शेतकऱ्यांचा प्रश्नही मार्गी लागला पाहिजे. मराठा समाजाच्या एकजुटीमुळे 2 कोटी पेक्षा जास्त मराठा समाज आतापर्यंत आरक्षणामध्ये गेला. आता येत्या 25 जानेवारी रोजी मी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करणार आहे. उपोषण मला किती सहन होईल हे मला माहिती नाही. पण मी माझ्या समाजासाठी मरायलाही तयार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय.


जरांगेंच्या या विधानाबद्दल नागपुरात मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, “मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही. आरक्षण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये पहिल्या दिवसांपासून मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिघांच्याही भूमिकेत कोणतेही अंतर नाही. यापूर्वी जे निर्णय आम्ही घेतले ते तिघांनी मिळून घेतले. यापुढेही जे निर्णय घ्यायचे ते आम्ही तिघेजण मिळून घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये