मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही – मुख्यमंत्री

मनोज जरांगेच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचे सडेतोड प्रत्युत्तर


नागपूर: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे यांनी, आता खरी मजा येईल हिशेब चुकता करायची आता बघू आरक्षण देतात की, नाही असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही असा टोला लगावला आहे. ते आज, बुधवारी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.


मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नरत आहेत. यासंदर्भात अजून ठोस निर्णय झालेला नाही. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आहेत. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे परभणी येथे कुणाचेही नाव न घेता म्हणाले की, “आता खरी मजा आहे, हिशेब चुकता करण्याची. आधी ते दुसऱ्यांवर ढकलत होते. पण आता कळेल की आरक्षण देतात की नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय संपल्यानंतर मी शेतकऱ्यांचा विषय हातात घेणार आहे.



शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर कसे देत नाहीत आणि धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचाही प्रश्न कसा मार्गी लागत नाही ? तेही मी पाहतो. शेतकऱ्यांचा प्रश्नही मार्गी लागला पाहिजे. मराठा समाजाच्या एकजुटीमुळे 2 कोटी पेक्षा जास्त मराठा समाज आतापर्यंत आरक्षणामध्ये गेला. आता येत्या 25 जानेवारी रोजी मी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करणार आहे. उपोषण मला किती सहन होईल हे मला माहिती नाही. पण मी माझ्या समाजासाठी मरायलाही तयार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय.


जरांगेंच्या या विधानाबद्दल नागपुरात मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, “मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही. आरक्षण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये पहिल्या दिवसांपासून मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिघांच्याही भूमिकेत कोणतेही अंतर नाही. यापूर्वी जे निर्णय आम्ही घेतले ते तिघांनी मिळून घेतले. यापुढेही जे निर्णय घ्यायचे ते आम्ही तिघेजण मिळून घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात