Election Commission : महाराष्ट्रातील मतदार याद्या 'ऑल इज वेल'; काँग्रेसच्या आरोपांना निवडणूक आयोगाचे उत्तर

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संपून एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. राज्यात झालेल्या निवडणुकांबाबत काँग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदारांची नावे अनियंत्रितपणे जोडली किंवा काढली नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.


काँग्रेसला दिलेल्या उत्तरात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, संध्याकाळी ५ वाजेच्या मतदानाच्या आकडेवारीची अंतिम मतदानाच्या आकडेवारीशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. संध्याकाळी ५ ते ११:४५ या वेळेत मतदानात वाढ होणे सामान्य आहे, जे मतदारांच्या मतदानाच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे आणि पडलेली मते आणि मतांची मोजणी यात वास्तविक पण क्षुल्लक फरक कसा असू शकतो हे देखील नमूद केले आहे.



मतदानाचा तपशील देणारा वैधानिक फॉर्म १७-सी मतदान केंद्रावर मतदान संपल्यावर उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींकडे उपलब्ध असल्याने प्रत्यक्ष मतदारांच्या संख्येत बदल करणे अशक्य आहे यावर निवडणूक आयोगाने भर दिला.


आयोगाने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मतदार यादी तयार करताना नियमावर आधारित प्रक्रिया पारदर्शकतेने पाळली गेली आणि राज्यातील मतदारांची नावे वगळण्यात कोणतीही अनियमितता झाली नाही. काँग्रेस प्रतिनिधींच्या सहभागासह मतदार यादी तयार करताना योग्य प्रक्रिया पाळण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने (Election Commission) स्पष्ट केले.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.