पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी हिंसाचारात मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली. या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला. या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ”राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आले होते. ही राजकीय भेट होती. लोकांमध्ये, जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम राहुल गांधी करतात. हेच त्यांचे ध्येय आहे. अनेक वर्षांपासून ते हेच करत आहेत”, असे चोख प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ”महाराष्ट्राचे सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. या चौकशीतून सत्य बाहेर येईल. यात लपवण्याचे कोणतेही कारण नाही. या चौकशीत जर सोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले, तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही कुणालाही सोडणार नाही”, असेही ते म्हणाले.
सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना, पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशीला मारहाण करून त्याची हत्या केली आहे’, असा आरोप त्यांनी केला होता.
तसेच सोमनाथ सुर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याच्यावर अन्याय करण्यात आला असून त्याला मारहाण करण्यात आली आहे. दलित आहे म्हणून सोमनाथ सुर्यवंशीची हत्या करण्यात आली. पोलिसांनीच त्याला मारले आहे. या घटनेला आरएसएसची विचारधारा जबाबदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटे बोलले आहेत”, असे देखील राहुल गांधी म्हणाले होते.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…