राहुल गांधीं द्वेषच पसरवत असतात - मुख्यमंत्री 

पुणे : राहुल गांधी राजकारण करण्यासाठी परभणीला गेले होते. सातत्याने द्वेषच पसरवत रहायचा इतकेच त्यांना जमते. परभणीतही राहुल यांनी तेच केल्याचे सडेतोड प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू म्हणजे हत्या आणि यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटे निवेदन केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुण्यात हे प्रत्युत्तर दिले आहे.

परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, दलित असल्यामुळे पोलिसांनी त्याची हत्या केली असून मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलल्याचा आरोप राहुल यांनी केला. यासंदर्भात फडणवीस यांना विचारले असता त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.


फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी याठिकाणी केवळ राजकीय हेतूने आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. लोकांमध्ये, जातीजातींमध्ये द्वेष तयार करायचा, एवढे एकमेव ध्येय त्यांचे आहे. तेच काम गेली अनेक वर्ष ते सातत्याने करताहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की, हे जे काही विद्वेषाचे त्यांचं जे काम आहे, त्याठिकाणी जाऊन पूर्ण केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. परभणी प्रकरणी राज्य सरकार संवेदनशील असल्यामुळेच, याठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी घोषित केलेली आहे. न्यायालयीन चौकशीत यासंदर्भातील सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल. काहीही लपवण्याचे कारण नाहीये. आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारामध्ये मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय, असे बाहेर आले, तर कुणालाही सोडले जाणार नाही. कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई केली जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये

राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

Navi Mumbai : कामोठे येथे सिलिंडर स्फोटानंतर घरात आग; दोघांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका घरात लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची