चक्क व्हॉट्सअ‍ॅप वरून बारावीचा पेपर मुलांपर्यंत पोहोचला? नागपुरातील धक्कादायक प्रकार समोर

मुंबई : राज्यात सध्या परीक्षेचे वारे वाहत आहेत, दहावी आणि बारावीची मुले आपल्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा देत आहेत. अशातच नागपूर येथून बारावीचे दोन पेपर फुटल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे.



नेमकं घडल काय ?


नागपूरमधील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थिनीची हालचाल संशयास्पद आढळली. ती वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने केंद्रातील परीक्षकांनी तिची झडती घेतली. तपासादरम्यान तिच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला.


मोबाईल तपासल्यावर एका व्हॉट्सअ‍ॅपच्या गटामध्ये प्रश्नपत्रिकेतील मजकूर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शेअर झाल्याचे आढळून आले. यात रसायनशात्र आणि भौतिकशास्त्र या पेपरचा समावेश होता. या गटात एकूण १५ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.



शिक्षकावर गंभीर आरोप


चौकशीत दोन विद्यार्थिनींनी एका खासगी शिकवणीतील शिक्षकाने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा आरोप केल्याचे समजते. संबंधित गटातील इतर १३ विद्यार्थी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत होते.



गुन्हा नोंद, तपास सुरू


केंद्रप्रमुखांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून सखोल तपास सुरू आहे. मोबाईलमधील मेसेज , कॉल रेकॉर्ड आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व