Beed: बीडमधील संतापजनक प्रकार; दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर चक्क मंडपात

बीड: राज्यात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरू झाली आहे. याच दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. बीड तालुक्यातील कुर्ला येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चक्क मंडपात बसून पेपर द्यावा लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना आता या मंडपातील उकाड्यात बसून दहावीची परीक्षा द्यावी लागणार आहे.या प्रकारावर पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



नेमका प्रकार काय?



बीड जिल्ह्यातील कुर्ला येथे दहावीचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. पण या केंद्रावर उपलब्ध असलेल्या खोल्यांच्या तुलनेत परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितलं जातं आहे. या वाढीव संख्येला सामावून घेण्यासाठी प्रशासनाने खोल्यांची पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी चक्क शाळेच्या मैदानात कापडी मंडप उभारला. या मंडपातच बाकडे टाकून विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


फेब्रुवारी महिना संपत आला असून मार्चच्या सुरुवातीलाच बीडमध्ये उन्हाचा पारा चढू लागला आहे. अशा रणरणत्या उन्हात कापडी मंडपाखाली बसून तीन तास पेपर लिहिणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कठीण जाणार आहे. उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, एखादा विद्यार्थी उष्माघातामुळे आजारी पडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.


बारावीची परीक्षा झाल्यानंतर दहावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचा दावा प्रशासन करत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र कुर्ला केंद्रावर पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांसाठी योग्य व्यवस्था का करण्यात आली नाही? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


Comments
Add Comment

Pune Crime :  पुण्यात मध्यरात्री रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; ६० ते ७० तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कथित रेव्ह पार्टीचा (Raid On Pune Rave Party) पर्दाफाश झाला असून गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री

Ashadhi Wari 2026 : आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर; पुण्यात २ दिवस रंगणार भक्तीचा महोत्सव

पुणे : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगला आहे. संत ज्ञानेश्वर

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52