Accident: भरधाव टँकरची धडक बसल्याने २ जण जागीच ठार

जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले. मोटारसायकलला धडक दिल्यानंतर फरार झाला. सदर अपघात अमळनेर नाका जवळील हॉटेल जत्राजवळ झाला. दरम्यान, अपघात झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला होता.

दरम्यान, अपघातस्थळी संतप्त जमावाने टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. संबंधित अधिकारी जोपर्यंत घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

राजेंद्र भिला भोई (वय ४६, रा. एरंडोल) आणि दीपक रामकृष्ण भोई (वय ४४, रा. शिरसोली ता. जळगाव) हे दोघे मोटार सायकल क्रमांक एम. एच. १९ बी. पी. २०७३ ने जात असतांना जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिल्यामुळे एक जण जागीच ठार झाले तर, एक जण गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला.

अपघातात मयत झालेले दोघेही जवळचे नातेवाईक असून राजेंद्र भोई हे जैन इरिगेशनमध्ये कामाला होते. नवीन बसस्थानकापासून केवळ पाचशे मीटर अंतरावर अपघात झाल्यामुळे नागरिकांनी अपघात स्थळी मोठी गर्दी करून मदत कार्य सुरु केले. यापूर्वी देखील याच ठिकाणी अनेकवेळा अपघात झाले असून सात ते आठ निरपराध जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी यासाठी यापूर्वी नागरिकांनी अनेकवेळा नागरिकांनी आंदोलन केले होते.

न्हाईच्या अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन देवून कोणतीही उपाययोजना केली नाही. अपघात झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु केले. रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आला. महामार्गावरच अवजड वाहन आडवे लाऊन वाहतूक रोखून धरली.

रास्तारोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, दशरथ महाजन, योगेश महाजन, गजानन महाजन, मनोज मराठे यांचेसह हजारो नागरिकांनी जोपर्यंत संबंधित अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली. याठिकाणी यापूर्वीदेखील अनेकवेळा अपघात झाले असून अपघाती जागा म्हणून या जागेची ओळख निर्माण झाली आहे.

अमळनेर नाका येथून नवीन वसाहतींमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. एक महिन्यापूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन एका युवक ठार झाला होता. राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका परिसरात अंडरपास करण्यात यावा अथवा उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली.

Comments
Add Comment

एसीएमई सोलारकडून १०० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पातील पुढील १६ मेगावॅटचा दुसरा टप्पा सुरू

गुरुग्राम: एसीएमई सोलर होल्डिंग्ज लिमिटेडने गुजरातमधील सुरेंदरनगर येथे असलेल्या त्यांच्या १०० मेगावॅट पवन

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे' मारलेल्या व्यक्तीचे निधन

विरार  : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट