Karjat Traffic : कर्जतच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर! श्रीराम पुल आणि रेल्वे पूल अरुंद असल्याने होते वाहतूक कोंडी

Share

कर्जत : कर्जत तालुका हा फॉर्म हाऊस च हब असल तरी आज तालुक्यात विविध ठिकाणी मोठं मोठं गृहप्रकल्प उभे राहत आहेत. कर्जत तालुका हा निसर्ग पूर्ण सौंदर्याने नटलेला आहे. पावसाळ्यातील चार महिने तर हिरवाईचा साज चढलेला दिसतो. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक पर्यटक कर्जतच्या प्रेमात पडतो. कर्जत मध्ये विविध फिल्म इंडस्ट्री,क्रिकेटर,संगीतकार आणि राजकीय नेत्यांची फॉर्म हाऊस घेतले आहेत. त्यामुळेच कर्जत कडे येणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचा थेट परिणाम कर्जत शहरातील मुख्य प्रवेशद्वार चार फाटा आणि श्रीराम पुल या मुख्य रस्त्यावर होताना दिसतो. त्यामुळे सध्या कर्जतच्या ट्रॅफिकचा प्रश्न (Karjat Traffic) ऐरणीवर आला आहे.

कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. परंतु चारही बाजूने येणारी वाहतूक यासाठी रेल्वे ब्रीज आणि श्रीराम पुल अपुरा पडत आहे. उल्हास नदीवरील जुन्या श्रीराम पुल अरुंद असल्याने या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उल्हास नदीवरील श्रीराम पुलाच्या बाजूला आणखी एका नवीन ब्रीज चे काम गेल्या वर्षी पासून सुरू आहे. सदर काम पावसाळ्यात बंद असल्याने ते अर्धवट स्थितीत आहे. या नवीन पुलाचे चे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी होत आहे. सदर पुलाचे काम पूर्ण झाल्यास दहीवली येथील होणारी ट्रॅफिक कमी होऊ शकते.

कर्जत चे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या चार फाटा येथील रेल्वे पूल देखील अरुंद असल्यानं शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी तर हमखास ट्रॅफिक होत असते. या ट्रॅफिक मुळे कधी कधी रुग्णवाहिका देखील अडकून पडतात. सायंकाळी तर जड वाहतुकीच्या गाड्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने त्याचा थेट परिणाम या ट्रॅफिक वर होताना दिसतो. श्रीराम पुल येथील दोन्ही दिशेला रस्ता रुंदीकरण झाल्याने दोन्ही बाजूने तीन तीन लेन करून गाड्या येत असतात परंतु श्रीराम पुलावरून फक्त दोन मोठ्या गाड्या जाऊ शकतील इतकाच रुंद असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. कर्जत चार फाटा रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी संबंधित विभागाने सिग्नल यंत्रणा बसविल्यास काही प्रमाणत वाहतूक सुरळीत हुऊ शकते.

सुट्टीच्या कालावधीत ट्रॅफिक सोडविणे म्हणजे डोके दुखी

शनिवार, रविवार आणि लागोपाठ सुट्टीचे दिवस असेल तर ट्रॅफिक सोडविणे म्हणजे पोलिस वाहतूक कर्मचाऱ्यांची डोके दुखी ठरते. तसेच कर्जत चौक रस्ता रुंदीकरणाच्या काम गेली दोन वर्षांपासून सुरू आहे .सदर काम धीम्या गतीने सुरू असल्याने अर्धवट असलेल्या रस्त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. श्रीराम पुल येथील नव्याने सुरू असलेल्या पुलाचे काम पूर्ण झाले आणि चार फाटा येथील आणखी एक नवीन रेल्वे पुल बांधण्यात आला तर कर्जतच्या ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

Recent Posts

Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…

5 minutes ago

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

40 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago