Central Railway : मुंबई-नागपूर प्रवास होणार आरामदायी! मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या

मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता  मुंबई - नागपूर दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा आता आरामदायी प्रवास होणार आहे.



कसे असेल वेळापत्रक?



  • लोकमान्य टिळक टर्मिनस - नागपूर साप्ताहिक विशेष (२ सेवा)


०२१३९ साप्ताहिक विशेष २१ डिसेंबर २०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. (१ सेवा)


०२१४० साप्ताहिक विशेष नागपूर येथून २१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. (१ सेवा)




  • थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

  • संरचना : एक प्रथमसह -द्वितीय वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी/चेअर कार, १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

  • आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक ०२१३९/०२१४० साठी विशेष शुल्कासह बुकिंग २० डिसेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा, असे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार