Central Railway : मुंबई-नागपूर प्रवास होणार आरामदायी! मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या

मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता  मुंबई - नागपूर दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा आता आरामदायी प्रवास होणार आहे.



कसे असेल वेळापत्रक?



  • लोकमान्य टिळक टर्मिनस - नागपूर साप्ताहिक विशेष (२ सेवा)


०२१३९ साप्ताहिक विशेष २१ डिसेंबर २०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. (१ सेवा)


०२१४० साप्ताहिक विशेष नागपूर येथून २१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. (१ सेवा)




  • थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

  • संरचना : एक प्रथमसह -द्वितीय वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी/चेअर कार, १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

  • आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक ०२१३९/०२१४० साठी विशेष शुल्कासह बुकिंग २० डिसेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा, असे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक