ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

नागपूर : ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


ही बस पुणे येथून महाडच्या दिशेने जात होती. यावेळेस ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. जखमींना तातडीने माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.


लग्नासाठी ही बस पुणे येथून महाडच्या दिशेने जात असताना ही दुर्देवी घटना घडली. यात ४०हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या अपघाताचे वृत्त कळताच माणगाव पोलीस निरीक्षकांनी टीमसह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.


लग्नासाठी जाधव कुटुंब महाडला जात होते. यावेळेस ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडली. यात गाडी एका बाजूला पलटी झाली. त्यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात २ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय

भटक्या कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला

श्रीवर्धन : राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसागणिक गंभीर होऊ लागली

अल्पवयीन मुलीचं शोषण करत धर्मांतरासाठी दबाव, भिवंडीतील संतापजनक प्रकार समोर

भिवंडी: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि तिला आंतरधर्मीय

युद्धाची झळ महाराष्ट्रापर्यंत, नाशिकमधील १२०० उद्योगांना फटका

मुंबई: इराण अमेरिका, इस्त्राईल युद्धाची झळ आता जगभरात बसताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या

Buldhana Crime: जेवणातून विष द्यायचा प्रयत्न फसला; शेवट मास्टर प्लॅन आखला अन् वृषाली गावंडेचा...

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं