ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

नागपूर : ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


ही बस पुणे येथून महाडच्या दिशेने जात होती. यावेळेस ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. जखमींना तातडीने माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.


लग्नासाठी ही बस पुणे येथून महाडच्या दिशेने जात असताना ही दुर्देवी घटना घडली. यात ४०हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या अपघाताचे वृत्त कळताच माणगाव पोलीस निरीक्षकांनी टीमसह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.


लग्नासाठी जाधव कुटुंब महाडला जात होते. यावेळेस ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडली. यात गाडी एका बाजूला पलटी झाली. त्यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात २ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

माणगावात मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन

२०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत. आयोजकांची माणगाव मध्ये पत्रकार परिषदेतून माहिती. माणगाव :

साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी , ३ महिला बेशुद्ध

छत्रपती संभजीनगर : सध्या छत्रपती संभजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रीलस्टार ची रील पाहून महिलांनी

Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी

१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड

पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी

हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही; महाराष्ट्रात मराठीचा सन्मान वाढवला जाईल

मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली